धर्माच्या नावावर तुम्हाला देश नाही बांधता येत, हे तुर्की ना अगोदर समजले : राज ठाकरे….

Date:

धर्म घराच्या उंबरठ्याच्या आत सांभाळला पाहिजे:राज ठाकरे

महाराष्ट्रातील 55 नदीपट्टे प्रदूषित, मुंबईतील चार नद्या मारल्या – ठाकरे
महाराष्ट्रातील नद्यांची परिस्थितीही बिकट आहे. कोकणातील सावित्री नदी केमिकलने भरली आहे. महाराष्ट्रातील 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. यामध्ये सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, वैनगंगा, चंद्रभागा, मुचकुंडा, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, ढोरणा या नदीपात्रांमधील पाणी हे अत्यंत वाईट आहे. हा माझा रिपोर्ट नाही, असे राज ठाकरे म्हणाले. मुंबईत पाच नद्या होत्या. त्यातील चार मेल्या. म्हणजे त्या मारल्या. सांडपाणी, झोपडपट्टी यांमुळे त्या चार नद्या मेल्या. आता पाचवीही मिठी नदी मरायला आली आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
तर चीनची भिंत बांधली गेली असती
प्रत्येकाला आपापला धर्म प्यारा असतो. प्रत्येकाने आपापल्या धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. ज्यावेळेला गंगेवरच्या या सगळ्या गोष्टी पाहत होतो, त्यावेळी मला कळेना हे कसे काय चालले. काय म्हणे 65 कोटी लोक येऊन गेले. म्हणजे अर्धा भारत आला का? असे म्हणत राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याला आलेल्या आकडेवारीवर सवाल उपस्थित केला. त्यातील 5 लाख आपण व्हिआयपी आणि व्हिव्हिआयपी पकडू. बाकीचे काठावरच बसले असतील. प्रत्येकाची जरी दोनशे दोनशे ग्रॅम पकडली, तर चीनची भिंत बांधता आली असती, असे राज ठाकरे म्हणाले.
देशाच्या नैसर्गिक गोष्टींवर अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, तर त्याचे काय करायचे?
ही गंगेची परिस्थिती आहे. आतापर्यंत 33 हजार कोटी रुपये खर्च झाले त्यावर. नुसते अग्नी दिल्यासारखे करतात आणि तसेच प्रेत पाण्यात ढकलून देतात. हा कोणता धर्म? देशाच्या नैसर्गिक गोष्टींवर अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, तर त्याचे काय करायचे? असा सवाल राज ठाकरे यांची केला. आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा करायला नको का? असेही ते म्हणाले. काळ बदलला, लोकसंख्या वाढली. हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. हे सर्व विधी करण्यासाठी वेगळ्या घाटावर एखादी जागा करता येत नाही का? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
गंगेत अंघोळ केल्यानंतर अनेक जण आजारी पडले – राज ठाकरे
निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले. अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे आणि शुभेच्छांचे अनेक फोन नेमके आजच आले. आज का आले? याचा अर्थ मला समजतो. गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या? त्यातील काही गोष्टी तुम्हाला सांगणे आवश्यक आहे, असे मला वाटते.
त्यातील पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणले. मी ते पिण्यास नकार दिला. नव्याने वारे शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटले मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? आपल्या देशातील नद्यांची भीषण अवस्था आहे. जिला आपण माता म्हणतो, देवी म्हणतो त्या नद्यांकडे आजचे राज्यकर्ते नाही, खूप वर्षांपासूनचे गंगा साफ करावी, असे बोलणारी पहिली व्यक्ती म्हणजे राजीव गांधी. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी गंगा साफ करण्याचे काम सुरू केले. तेव्हापासून अजून गंगा साफ करत आहेत. त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांनीही गंगा साफ करणार असे सांगितले.
आपल्याकडील देशामधील नद्यांची अशी अवस्था आहे की, पाणी पिणे लांबची गोष्ट, तुम्ही अंघोळ करू शकत नाहीत. माझ्याकडे उत्तरेतील लोक येऊन गेले. त्यांनी सांगितले की, कित्येक लाखो लोक इथे अंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत. प्रश्न हा गंगेच्या, कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये. तर प्रश्न हा पाण्याच्या स्थितीचा आहे. कशाप्रकारचे पाणी तिथे असते, होते. त्या गोष्टी अजूनही थांबवले जात नाही, असे राज ठाकरे म्हणाले. एका मिनिटासाठी गंगेची स्थिती काय आहे, हे मी तुम्हाला दाखवतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी गंगा नदीचा एक व्हिडिओ दाखवला.
ईव्हीएमवरून राज ठाकरेंचा पुन्हा एकदा निशाणा
गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मते दिसली. त्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो. ज्या मतदारांनी मनसेला मतदान करून देखील ईव्हीएममध्ये त्यांची मते दिसली नाहीत, त्यांचेही मी आभार मानतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरून निशाणा साधला. निवडणुका कशा झाल्या? काय काय गोष्टी घडल्या? यावर माझे बोलून झालेले आहे. आता जे झाले ते झाले. आता यापुढचे बघायचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’चे मराठी ओटीटी विश्वात लवकरच होणार पदार्पण!

‘नाफा स्ट्रीम’(NAFA STREAM) नॉर्थ अमेरिकेत मराठी मनोरंजनाच्या कक्षा विस्तारणार!"स्वतंत्र...

मुंबई हायकोर्टासह नागपूर, वांद्रे कोर्ट ‘बॉम्ब’ने उडवण्याची धमकी

मुंबई-येथील उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला कोर्ट आणि राज्याची...

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजपचे 150 जागांवर एकमत,77 जागांवर चर्चा,227 जागांवर महायुती लढेल

मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन...

पारंपरिक प्रचाराला आधुनिकतेची जोड! बीडकरांची प्रचारात आघाडी; प्रभाग २४ मध्ये फिरू लागले ‘विकासरथ’

पुणे-महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांच्या नजरा प्रमुख पक्षकांकडून...