Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कामराने दीड मिनिटात हुकूमशाहीच्या खुर्चीखाली स्फोट केला

Date:

संजय राऊत म्हणाले की, भाजप व त्यांच्या टोळ्यांचे ढोंग युद्धाच्या मैदानात टिकले नाही. कुणाल कामराने ते दीड मिनिटात संपवले. भाजपची झुंडशाही पोकळ पायावर उभी आहे हे कामराने दाखवले. पुन्हा कामरा गुडघे टेकायला तयार नाही. तो बलिदानासही तयार आहे. अशा माणसाचे शिंदे-फडणवीस काय वाकडे करणार! कामराने दीड मिनिटात हुकूमशाहीच्या खुर्चीखाली स्फोट केला… उखाड दिया! असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई-महाराष्ट्रातील किंवा भारतातील राजकारणी म्हणजे प्रेषित नाहीत. प्रेषितांचे व्यंगचित्र काढले म्हणून फ्रान्ससह अनेक देशांत दंगली उसळल्या. महाराष्ट्रात कोणी स्वत:ला प्रेषित समजत आहेत काय? कुणाल कामरावरील पेटलेल्या राजकारणावरुन असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, भाजपची झुंडशाही पोकळ पायावर उभी आहे हे कामराने दाखवले. पुन्हा कामरा गुडघे टेकायला तयार नाही. तो बलिदानासही तयार आहे. अशा माणसाचे शिंदे-फडणवीस काय वाकडे करणार! कामराने दीड मिनिटात हुकूमशाहीच्या खुर्चीखाली स्फोट केला… उखाड दिया! मोदी यांच्या काळात सत्य बोलण्यावर बंदी आहेच. आता बोलण्यावर आणि हसण्यावरही बंदी आली काय, असा प्रश्न पडतो. एका व्यंगात्मक गाण्यावरून महाराष्ट्रात तोडफोड झाली. हिंसाचार आणि कुणाल कामराला ठार करण्याची भाषा सुरू आहे.

संजय राऊत म्हणाले की, भारतात सत्य बोलण्यावर अलीकडच्या काळात बंदी होतीच, आता बोलण्यावरही बंदी येताना दिसत आहे. लोक बोलत नाहीत. लोक आरडाओरड करतात नाहीतर हाती काठय़ा घेऊन तोडफोड करतात. हे चित्र विचलित करणारे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली आरडाओरड औरंगजेबापासून सुरू झाली ती कामेडियन कुणाल कामरापर्यंत येऊन थांबली. आफ्रिकेतील काही देशांत आजही वंशयुद्ध आणि टोळीयुद्ध चालते. तसेच हे घडताना दिसले. आपण सगळेच किती असहिष्णू झालो आहोत याचा हा नमुना. काही वर्षांपूर्वी बराक ओबामा भारतात आले. त्यांनी भारताला सहिष्णुतेवर `लेक्चर’ दिले. त्या वेळी भारतातला एकही प्रतिष्ठित नागरिक उभा राहिला नाही व त्याने ओबामा यांना सांगितले नाही की, “साहेब, भारताची जगात ओळख सहिष्णू अशीच आहे. तुम्ही आम्हाला सहिष्णुतेचे धडे कृपया देऊ नका.” आता वाटते, ओबामा खरे तेच बोलले होते. भारतातून सहिष्णुता तडीपार झाली आहे.

संजय राऊत म्हणाले की, औरंगजेबाच्या कबरीचे राजकारण संपल्यावर नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील समर्थकांनी रात्रीच्या अंधारात कुणाल कामरा या स्टाण्डअप कामेडियनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो सापडला नाही तेव्हा तो जेथे कार्पाम करतो त्या स्टुडिओवर हल्ला केला व ते कलाकारांचे व्यासपीठ उद्ध्वस्त केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर एक राजकीय व्यंगात्मक गाणे रचले म्हणून शिंदे यांचे लोक भडकले. त्यांच्या भावना भडकल्या. शिंदे यांच्या भाषेत आक्शनला रिआक्शन झाली. शिंदे यांचे हे बोलणे अगदीच हास्यास्पद आहे. शिंदे यांच्यासाठी जे लोक कामराच्या स्टुडिओवर चाल करून गेले ते सर्व लोक भाडोत्री आहेत. कालपर्यंत हे लोक मूळ शिवसेनेसाठी हाणामाऱ्या करीत होते. आज ते शिंदेंसाठी करतात. शिंदेंची सत्ता नसेल तेव्हा ते दुसरा मालक शोधतील. यात भावना वगैरे आल्या कोठून? सगळा पैशांचा आणि सत्तेचा खेळ.

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे सगळ्यात जास्त नुकसान त्यांच्या सभोवतीचे बिनडोक लोकच करीत आहेत. बिनडोक सेनेचे ते नेते झाले आहेत. कुणाल कामरा प्रकरणात ते स्पष्ट दिसले. कामराने ठाण्यातील रिक्षावाल्याचा त्रास केंद्रस्थानी ठेवून एक व्यंगगीत रचले व गायले. त्यात तो दाढीधारी रिक्षावाला गद्दारी करून आपल्या लोकांना घेऊन गुवाहाटी येथे जातो असे लिहिले. गाण्याचे शब्द त्यांच्या काळजात आरपार घुसले, ते नक्की काय आहेत? कामराने ‘दिल तो पागल है’चे पारोडी गीत त्याच्या शोमध्ये गायले. त्यात शिंदे यांचे नाव कोठेच नाही.

या गाण्यातला आशय नवा नाही. याला `सटायर’ म्हटले जाते. गेल्या चारेक वर्षांपासून गद्दारी आणि खोके या विषयावर महाराष्ट्रात विनोदी गाण्यांचा आणि जोक्सचा पाऊस पडला आहे. विधानसभा निवडणुकीत गद्दारीवरील गाणी प्रचारात आणली. त्यावर कुणाच्याच भावना भडकल्या नाहीत, पण कामराच्या गाण्याने त्या भडकल्या. शिंदेंच्या लोकांनी कामराच्या स्टुडिओवर हल्ला केला व त्यामुळे रिक्षावाल्यांचे गद्दारीवरचे गाणे कोटय़वधी लोकांपर्यंत पोहोचले. जे काम विधानसभेतील प्रचारात झाले नाही ते शिंदे व त्यांच्या लोकांनी केले. त्याबद्दल मूळ शिवसेनेने शिंदे यांच्या भाडोत्री लोकांचे आभार मानायला हवेत. मूर्ख राजकारण्यांना विनोद कळत नाही. विनोद हा जीवनाचा विरंगुळा आहे. विनोद आणि व्यंग नसते तर माणसाचे जगणे कठीण झाले असते. माणसांचे खळखळून हसणे मोदींच्या अमृत काळात बंद पडले आहे. त्यामुळे विनोदी लेखक व कलाकारांवर हल्ले होत आहेत.

संजय राऊत म्हणाले की, काव्य स्वर्गात निर्माण होते आणि विनोद पृथ्वीवर उत्पन्न होतो. विनोदाची पुढची पायरी विडंबन. उपहास हा विडंबनाचा आत्मा असल्यामुळे ते अनेकदा प्रखर भासते. समाजातील फसवणूक, लांडय़ालबाडय़ा, राजकारण्यांचा ढोंगीपणा, केवळ पैसा व सत्ता मिळविण्यासाठी रचलेले निष्ठावंतांचे सोंग चव्हाट्यावर आणण्यासाठी विडंबनाचा फार उपयोग होतो. आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र लढय़ात विडंबनाचे हत्यार चालवले व महाराष्ट्राचे शत्रू लटपटले. महाराष्ट्रातील लोकांना फसवण्याचा उद्योग गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. त्या फसव्यांना `झटका’ देण्याचे काम कुणाल कामराच्या व्यंगकाव्याने केले.

संजय राऊत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. त्यांचा कुंचला म्हणजे वाघाचा पंजा होता. त्या पंजाच्या फटकाऱ्यांनी अनेकांना घायाळ केले. डेव्हिड लो हा व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुखांचा आदर्श. बाळासाहेब नेहमी सांगत, “शंभर अग्रलेखांची ताकद एका टोकदार व्यंगचित्रात असते.” दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी डेव्हिड लो याच्या व्यंगचित्रांमुळे हिटलर बेजार झाला होता. शेवटी त्याने आपल्या सैन्याला आदेश दिला, “व्यंगचित्रकार डेव्हिड लो याला जिवंत किंवा मुडदा’, जसा मिळेल तसा माझ्यासमोर घेऊन या.” हिटलर जसा डेव्हिड लो याला घाबरला, त्याप्रमाणे मोदी व त्यांचे समर्थक कुणाल कामरासारख्या व्यंगकलाकारांना घाबरलेले दिसतात. शिंदे व त्यांच्या लोकांनी कामरा यालाजिंदा वा मुर्दा’ ताब्यात घ्यायचे ठरवले आणि मुख्यमंत्री फडणवीस हा तमाशा सहन करीत आहेत.

संजय राऊत म्हणाले की, कुणाल कामराने राहुल गांधी, मनमोहन सिंग यांच्यावरही विडंबन केले, पण तोच कुणाल राहुल गांधींच्या `भारत जोडो’ यात्रेत गांधींबरोबर चालताना दिसला. राहुल गांधींनीही राग मनात ठेवला नाही. याला सहिष्णुता म्हणतात. ही सहिष्णुता मारली जात असताना जे लोक शांत बसतात ते हुकूमशाही बळकट करण्यास मदत करतात. शिंदे यांच्या लोकांनी कुणाल कामराला ठार मारण्याची धमकी दिली व गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री फडणवीस सांगतात, “कुणाल कामराने शिंदे यांची माफी मागावी.” मग तुमच्याकडे असलेले गृहखाते काय कामाचे? दंगलखोरांना मुक्त रान देऊन आपण कामराला माफी मागायला सांगत आहात. शिंदे व त्यांच्या लोकांनी तीन वर्षांत जे स्वार्थी राजकारण केले, त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली. शिंदे व त्यांच्या लोकांनीच महाराष्ट्राची माफी मागायला हवी.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात शिमगा हा सण आवडीने खेळला जातो. शिमग्यात आपल्या विरोधकांच्या नावाने शिवराळ बोंबा मारणे, त्यांच्यातील व्यंग शोधून चिखलफेक करणे असले सनातनी आणि हिंदुत्ववादी प्रकार होतात. कुणाल कामराने त्याच `सनातनी’ पद्धतीने शिमगा केला. यावर नकली हिंदुत्ववादी दंगल करण्यापर्यंत भडकावेत? नागपुरात दंगल झाली. त्या दंगलीत झालेले नुकसान दंगलखोरांकडून वसूल करू असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. आता मुंबईतील ज्या हाबिटॅट स्टुडिओवर दंगलखोरांनी हल्ला केला व नासधूस केली ते साधारण 45 लाखांचे नुकसान याच दंगलखोरांच्या म्होरक्यांकडून वसूल केले पाहिजे. नागपूरचे दंगलखोर वेगळे व कामराचा स्टुडिओ तोडणारे दंगलखोर वेगळे, असा भेद करता येणार नाही. कायदा सगळय़ांसाठी सारखाच असायला हवा. नागपूरची दंगल हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असेल तर मुंबईतली स्टुडिओ तोडण्याची दंगलदेखील कलंकच म्हणायला हवी, पण श्री. फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना उघडे पाडू इच्छितात. महाराष्ट्राचे वातावरण शिंदे व त्यांचे लोक बिघडवत असल्याचे फडणवीस यांना लोकांना दाखवायचे आहे. त्यामुळे ते कायद्याची भाषा करीत नाहीत व कामराने शिंदेंची माफी मागावी अशी अलोकशाही भाषा ते करतात. देवेंद्र फडणवीस हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे मानायला तयार नाहीत असेच दिसते. कंगना राणावत या महिलेच्या बेताल वक्तव्यांना पाठिंबा देताना त्यांना हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवले, पण कुणाल कामरा प्रकरणात ते स्वातंत्र्य मानत नाहीत. कंगना राणावतने मुंबईची तुलना तेव्हा पाकिस्तानशी केली म्हणून लोक भडकले. पण फडणवीस कंगनाच्या समर्थनासाठी उतरले. हा दुटप्पीपणा आहे. नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही, एकनाथ शिंदेंची झुंडशाही व फडणवीस यांची बनवाबनवी यांच्या ठिकऱया कुणाल कामराच्या दीड मिनिटाच्या व्यंगकाव्याने उडवल्या!

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड

पुणे- सह्याद्री रुग्णालयात एका व्यक्तीचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या...

गोव्यात नाईटक्लबपासून हॉटेल्सपर्यंत सर्व आस्थापनांची होणार सुरक्षा पुनर्तपासणी

“हडफडेची पुनरावृत्ती नाही! गोवा सरकारची कठोर भूमिका; संयुक्त अंमलबजावणी...

शीतल तेजवानीचा आता थेट रणबीर कपूरवर निशाणा!

पुणे-कोरेगाव पार्क , मुंढवा येथील गाजलेल्या 40 एकराच्या सरकारी...