मुंबई-महाराष्ट्रात एकप्रकारे गुजरात किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न राबवला जात आहे. महाराष्ट्र थोडासा वेगळा आहे असे आम्हाला वाटले होते पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्याच मार्गाने नेत आहेत. अजित पवार यांचा मार्ग मला वेगळा दिसत आहे, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवारांना हे सर्व माहिती असल्याने त्यांची भूमिका आणि भाषा वेगळी आहे. पण ते कैचीमध्ये अडकलेले दिसून येत आहे. कुणाल कामरा आणि माझे कालच बोलणं झाले. मी त्याला सांगितले की आपण कायद्याला सामोरे गेले पाहिजे. कुणाल कामरा हा अतिरेकी, देशद्राही कोण आहे तो? ता काय अल कायदाचा मेंबर आहे का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.संजय राऊत म्हणाले की, प्रताप सरनाईक यांनी लक्षात घेतले पाहिजे की तुम्ही फार किरकोळ लोकं आहात. बाळासाहेब ठाकरे नाही, त्यांच्यासोबत स्वत:ची तुलना करू नका. तुम्ही चिल्लर लोकं आहात, हे लक्षात ठेवा. कुणालने कुठे यावे कुठे नाही हे ठरवणारे तुम्ही कोण आहात. तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का? तसे जाहीर करा की तुम्ही त्यांचा खून करणार आहात. ह्या सर्व गल्लीतील टोळ्या आहेत. दाऊदने जसे शुटर नेमले होते तसे यांनी राजकारणात नेमले आहे. त्यांच्याकडे असलेले गुंड हे भाडोत्री गुंड आहेत, सत्ता गेली तर ते सोबत राहणार नाही.
संजय राऊत म्हणाले की, कुणाल कामरा हे देशातील एक कलाकार, कवी, लेखक आहेत. शिंदेंचे कुणाबरोबर फोटो आहे ते आम्ही बाहेर काढू का? कुणाल हा फुटीरतावादी आहे का? त्याने मला विचारल्यावर मी सांगितले आपण कायद्याला समोर गेले पाहिजे. हा देश संविधानावर चालतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईत हे असे हल्ले आपल्याला सहन करावे लागतात. आम्हीही सुद्धा सहन केले आहे. कुणी जर कायदेशीर कारवाई केली असेल तर त्याला सामोरे गेले पाहिजे.
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या गटातील लोकांना कुणाल कामरा जर क्षत्रू वाटत असेल तर आम्ही त्याच्याशी बोलायचे नाही का? आम्हालाही वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्राचे क्षत्रू आहेत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोकं त्यांच्या पायाशी जाऊन बसतात. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू.
संजय राऊत म्हणाले की, कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्यावर आणलेला हक्कभंग मान्य करण्यात असेल तात्यावर आमचे काही म्हणणे नाही. आमदारांचा हक्कभंग आणायचा अधिकार असून आमचे लोकं त्यांना उत्तर देतील. महाराष्ट्रात परिवहन खात्याचे अनेक प्रश्न आहेत, प्रताप सरनाईक यांनी त्याचा अभ्यास करावा, त्यावर त्यांनी बोलले पाहिजे. तुमच्यावर टीका केली म्हणून कुणी राष्ट्राचे शत्रू होत नाही. तुम्हाला उत्तर देण्याचा अधिकार आहे ते तुम्ही देऊ शकतात, पण त्यांची एक पद्धत असते.