मुंबई- मी जबाबदारीने सांगतो काल अध्यक्षांच्या कर्मचाऱ्याच्या ऑफिसात सत्ताधारी पक्षाचे आमदार गेले असून लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत, असे आमदारांनी विचारल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदावर अन्न बनसोडे यांची निवड झाल्यावर त्यांच्या अभिनंदानार्थ बोलताना भास्कर जाध म्हणाले, फादावीस आणि अजितदादा यांनी बनसोडे हे पान टपरीवाले होते असे सांगून त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले आहे . मी देखील ट्रक वर क्लीनर होतो . असे सांगून त्यांनी वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देत आता विधान भवनात प्रवेशासाठी १० हजार रुपये घेतले जात असल्याच्या बातमी कडे लक्ष वेधले आणि अध्यक्षांच्या अधिकाऱ्यांकडे सत्ताधारी आमदार गेले होते आणि त्यांनी लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील अशी विचारणा केल्याचा आरोप करताच सभागृहात गोंधळ झाला.
भास्कर जाधवांनी विधानभवनातील गैरव्यवहाराचे करताच विधान.. सभागृहात गोंधळ .
Date: