जयकुमार गोरेंना CM पाठीशी घालत असल्याचा रोहीत पवारांचा आरोप

Date:

मुंबई : मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर होत असलेल्या आरोपावरुन आमदार रोहित पवार सभागृहमध्ये तर सभागृहाबाहेर खासदार सुप्रिया सुळे आक्रमक आहेत. या दोघांनी जयकुमार गोरे यांच्याविरोधात सापळा रचला असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात काल केला.
मात्र त्यावर स्पष्टीकरण देण्याची परवानगी रोहित पवारांना देण्यात आले नाही. यावर त्यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले आहे. जयकुमार गोरे यांच्याविरोधात एक गठ्ठा पुरावे आहेत, त्यांचा राजीनामा तर होणारच असे आव्हानच आमदार रोहित पवार यांनी दिले आहे. ते म्हणाले, अंतिम आठवड्यावर उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचा विषय आणला आणि सुप्रिया सुळे आणि माझे नाव घेतले. मात्र जेव्हा मी राइट टू रिप्लायची विनंती केली तर मला बोलू दिले नाही. मुख्यमंत्र्यांनी फक्त त्यांच्या भाषणातून आमचे नाव रेकॉर्डवर आणण्यासाठी हे केले का, असा संतप्त सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने आरोप केले. एका महिलेला एका मंत्र्याने अश्लील फोटो पाठवल्याचे आम्हाला एका महिला पत्रकाराने सांगितले, तिथून हा विषय सुरु झाला. महिलेच्या न्यायासाठी एक ते दोन फोन झाले असतील. मात्र 100-200 फोन केले नाही, असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार म्हणाले की, जयकुमार गोरे हे या प्रकरणी हायकोर्टात बेलसाठी गेले आहेत. हे प्रकरण आणि फोटो पाहून चुकीचं इंटेशन असल्याचं कारण देत न्यायमूर्तीने जामीन नाकारला. असं सर्व प्रकरण असताना मंत्र्यांविरोधात हक्कभंग आणू दिला जात नाही. उलट पत्रकारांनी प्रश्न विचारु नये म्हणून एका पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात आलं. आम्ही सभागृहात काही बोलू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझं आणि सुप्रिया सुळेंचं नाव घेतलं.

रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझं (रोहित पवार) नाव घेतलं, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचं देखील नाव घेतलं. तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं की त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. तसेच पत्रकारालाही न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही एक किंवा दोन फोन केले असतील. पण शंभर ते दोनशे फोन केले गेले नाहीत. आता तेथे कारवाई सुरू आहे. पण हा विषय फक्त पारदर्शकपणे हाताळायला हवा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे

मात्र पीडित महिलेला सापळा रचून एक कोटींच्या खंडणीत अडकवण्यात आलं आहे. अरुण देवकर नावाचा पीआय आहे, त्याने पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. देहव्यापाराचे आरोप या पीआयवर आहेत. दुर्दैवाने त्या महिलेचा वकिल मॅनेज झाला. त्या वकिलाने फीचे पैसे घेऊन बोलावून तिथे देवकरने लावलेल्या ट्रॅपमध्ये महिलेला अडकवले. त्या पीडित महिलेला मी किंवा सुप्रीया सुळे यांनीही फोन केला नाही, असे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी विधिमंडल परिसरात माध्यमांशी बोलताना दिले.

एक कोटी रुपयांची लाच घेताना पीडितेला पकडण्यात आले आहे, हे एक कोटी रुपये कॅश कुठून आली, कोणी आणली, असे प्रश्न उपस्थित करत रोहित पवार म्हणाले की एवढी मोठी रोख रक्कम घेऊन येणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत का? ते मंत्र्यांचे मित्र आहेत म्हनु न त्यांना सोडून दिले जाणार असाही टोला त्यांनी लगावला.

ते म्हणाले की, तुषार खरात नावाच्या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोप झाले. का तर त्याने यांच्या (जयकुमार गोरे) विरोधात बातम्या केल्या. यांनी (जयकुमार गोरे) मृत व्यक्तीची नावाने असलेली जमीनी लाटल्या, पैसे खालले याच्या बातम्या त्याने केल्या. ते मंत्री असल्याने त्यांचा हक्कभंग स्वीकारला जातो, मात्र आम्हाला हक्कभंग आणू देत नाही. आम्हाला हक्कभंग आणू दया. आम्ही पुराव्यांचा गठ्ठे मुख्यमंत्र्यांना आणून देऊ, असेही रोहित पवार म्हणाले.जयकुमार गोरे यांच्या विरोधात एवढे पुरावे आहे की त्यांचा राजीनामा घेतला जाईल, असे आव्हानच रोहित पवार यांना दिले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...

राष्ट्रीय कला उत्सवाला जल्लोषात सुरुवात

पुणे दि. २०: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय...