पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर पडसाद नागपूर दंगलीच्या रुपाने समाेर आलेत. साेशल मिडियावर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर देखील पाेलिसांची नजर असून याबाबत कठाेर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पुण्यात देखील इन्स्टाग्राम स्टेटसला औरंगजेबचा फाेटाे ठेवत वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी दाेन तक्रारी पाेलिसांकडे आल्या. त्यानुसार दाेन जणांवर पाेलिसांनी समर्थ आणि विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात याबाबत विष्णू मनाेज साळुंके (वय- २४,रा. येरवडा,पुणे) यांनी इन्स्टाग्राम आयडी नंबर लाला २७१० वापरकर्ते विराेधात पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित इन्स्टाग्राम आयडीधारकाने त्याचे इन्स्टाग्राम स्टेटसला औरंगजेबची कबर व त्याखाली ‘ऊस बादशाह की क्या शान रही हाेगी जिसका नाम लेके आजतक लाेग सियासत करते है’ असा स्टेटस ठेवला. यामुळे संबंध हिंदु समाजाच्या भावना दुखावून हिंदु मुस्लिम समाजात तेढ निर्माण हाेऊन सार्वजनिक शांतता बिघडविण्याचे हेतूने पाेस्ट प्रसारित करण्यात आली आहे. याबाबत घटनेची माहिती मिळाल्यावर, खडकर विभागाचे सहाय्यक पाेलीस आयुक्त विठ्ठल दबडे, विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याच्या वरिष्ठ पाेलिस निरीक्षक कांचन जाधव, पाेउपनि नितीन राठाेड यांनी तक्रारदार यांचेसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक शब्बीर शेख करत आहे.
दुसऱ्या घटनेत समर्थ पाेलिस ठाण्यात हेमंत दत्ता गायकवाड (वय- २५,रा.मंगळवार पेठ,पुणे) यांनी पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आराेपी सईद अमजद पठाण (रा.राजेवाडी,पुणे) याचे विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपी याने हिंदु समाजाच्या भावना दुखावुन, हिंदु व मुस्लिम या समाजात तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था धाेक्यात येईल अशाप्रकारे वाद निर्माण हाेण्याचे उद्देशाने त्याचे इन्स्टाग्रामवर औंरंगजेबचे स्टेटस ठेवले हाेते. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक सुहास पाटील करत आहे.