पुणे-काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात होणाऱ्या महाराजांच्या अपमानाच्या पा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते म्हणाले की, ‘कोरटकर सारखा निर्लज्ज माणूस देश सोडून पळून जातो. यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक योजना सुरु केली आहे की काय ? कि महाराजांचा अपमान करा आणि पळून जा. या विकृत माणसाला सरकारने सुरक्षा पुरवली. इंग्रज देखील औरंगजेब एवढे जुलमी आणि क्रूर होते. अपमान करा आणि पुरस्कार मिळवा असचं सुरु आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार तुघलकी आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे कोणत्याही प्रकारची माफी मागणार नाही. एकनाथ शिंदे हे मला माफी मागा नाही तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करतो, असे म्हणत धमकावत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेला माजी मंत्री रमेश बागवे, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे,प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी,अनंत विठ्ठलराव गाडगीळ, दिप्ती चौधरी,युवक कॉंग्रेसचे सौरभ बाळासाहेब अमराळे पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप, संजय बालगुडे, आदी उपस्थित होते. त्यानंतर काँग्रेस प्रांताध्यक्ष यांनी पुणे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी, पिंपरी चिंचवड पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले.
सपकाळ पुढे म्हणाले की, कोरटकर पळून जातो सरकार काय करत आहेत? तुमचा, देशाचा गृह विभाग झोपला होता का? कोरटकरला पळून जाण्यासाठी मदत करण्यासाठी पोलिसांना देवेंद्र फडणवीस यांनी भाग पाडले आहे का? असा सवाल देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. दुसरीकडे माजी मंत्र्याचा लाडका मुलगा न सांगता पळून जातो त्याच विमान मागे बोलावून परत आणले जाते आणि महाराजांचा अपमान करणारा आरोपी पळून जातो. असं देखील सपकाळ म्हणाले आहेत.हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, मी कोणाबद्दल एकेरी बोललो नाही, अपमानजनक बोललो नाही. मग माफी का मागावी. सरकारकडून प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही त्याबाबत बोलले जात नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.सपकाळ म्हणाले की, पुण्याची सभ्य, सुसंस्कृत मुल्य आहे. मतभेद असले तरी चालेल पण मनभेद नको. राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात असावे, टीका केली जावी पण एकमेकांनी व्यवस्थित राजकारण केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह व्यक्त्व्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर हा परदेशात पळून गेला. गृहमंत्री आणि तो नागपूर मधील असल्याने त्यांचे परिचय आहे. सपकाळ म्हणाले की, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या सोबत त्याचे सलगीचे संबंध आहे. त्यावर कारवाई न करता औरंगजेब कबर उखडून टाकणे प्रश्न निर्माण करण्यात आला आहे. राज्यातील कारभार पाहता तो क्रूर पद्धतीचा आहे म्हणून औरंगजेबाचा कारभार व फडणवीसांचा कारभार सारखाच आहे असे मी म्हणालो असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी असे म्हणून माझ्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिंदेंनी मागणी केली पण मी माझ्या विधानावर आजही ठाम आहे, माफी मागण्याचा प्रश्नच नाही. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगितले. माझ्या विधानावर कारवाईचा इशारा देणारे दोन्ही उपमुख्यमंत्री राहुल सोलापुरकरच्या विधानावर गप्प का आहेत? प्रशांत कोरटकर कसा पळून गेला? त्याच्यावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न सपकाळ यांनी केला. पुणे शहरात राज्यभरातून शिक्षणासाठी मुले मुली येतात, पण या शहरात आता ड्रग्जची खुलेआम विक्री होते, गुजरातच्या कांडला बंदरातून ड्रग्ज येतात त्याचा तपास केला जात नाही. महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का, असा प्रश्न जनतेला पडला असून राज्यातील गृहविभागाचा कारभार पाहता राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्र्याची गरज आहे असेही सपकाळ म्हणाले.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विकृत बोलणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाहीत तर दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काडला जात आहे. कबर उखडून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. औरंगजेब जसा क्रूर होता तसेच इंग्रजसुद्धा क्रूर व जुलमी होते, त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड केले, भगतसिंग सारख्या अनेक क्रांतीकारकांना फाशी दिली, त्या इंग्रजांचे हस्तक म्हणून ज्या लोकांनी काम केले, ज्यांनी इंग्रजांची पेन्शन घेतली यांची स्मारके, पुतळे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल उखडून टाकणार का, याचे उत्तर त्यांनी द्यावे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
कोरटकर देश बाहेर पळून जाताना त्याला कोणी मदत केली, गृह खाते झोपले होते का? पोलिस यांनी त्याला संरक्षण होते का? पोलिसांची त्याला पाळून जाण्यास फूस होती का ? याबाबत गृहमंत्री यांनी उत्तर द्यावे. सपकाळ म्हणाले की, लाडका मंत्री, ठेकेदार, मुलगा अशा योजना सरकारने सुरू केल्या असून माजी मंत्री यांचा मुलगा देशा बाहेर जाताना त्याला संरक्षण दिले जाते. क्रांतिकारक, महापुरुष यांच्यावर टीका करून पोलिस संरक्षण दिले जात आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर कोणती कारवाई केली गेली नाही. बीडमध्ये संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणात तपासात हलगर्जीपणा झाला. पोलिस धाक नसल्याने स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीवर बलात्कार झाला. केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलीची छेड काढून आरोपींवर कारवाई होत नाही. परभणी मध्ये पोलिस कोठडीत अमानुष मारहाणमध्ये मृत्यू झाला. या सर्व घटनेतून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था याची लक्तरे काढणारे आहे.