दिशा सालियान प्रकरणी शिंदें गटात मतभेद:संजय गायकवाड म्हणाले- आदित्य ठाकरेंना क्लीन चीट, तर संजय शिरसाट म्हणाले- दिशाचा प्रथमदर्शनी खून

Date:

मुंबई-दिशा सालियान प्रकरणी तिच्या वडीलांनी जी याचिका केली आहे, तो त्यांचा निर्णय आहे. त्या प्रकरणी सीआयडीने सांगितले आहे की यात कुठलाही राजकीय अँगल दिसत नाही. 14 व्या मजल्यावरुन पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे, असे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.संजय गायकवाड पुढे बोलताना म्हणाले की, शासनाच्या सर्व यंत्रणा जर राजकीय अँगल दिसत नाही असा रिपोर्ट देतात. त्यामुळे कोणावरही चिखल फेक करणे किंवा कोणाला फसवणे मला तरी योग्य वाटत नाही.दिशा सालियान हिची प्रथमदर्शनी खून झाला आहे. तिच्या वडीलांवर दबाव होता आता ते हायकोर्टात गेले आहेत. या प्रकरणात अनेक जण असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांकडून जलदगतीने तपास केला जाईल आणि आरोपीला शिक्षा होईल, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

संजय गायकवाड म्हणाले की, ज्या वेळेला पोलिस यंत्रणांनी आदित्य ठाकरेंना सगळ्या प्रकरणातून क्लीन चीट दिली आहे. तर मला वाटते हायकोर्टातील याचिकेतून वेगळे काही बाहेर पडणार नाही. तिच्या कुटुंबियांना पोलिस यंत्रणेवर विश्वास नसावा म्हणून त्यांनी याचिका केली असेल.सीआयडीने तपास केला त्यावर त्यांना विश्वास नसावा. नीतेश राणे आणि नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे छळ केला, त्यामुळे ते संधी मिळाल्यावर ठाकरे कुटुबियांना सोडणार नाही. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे.

संजय गायकवाड म्हणाले की, औरंगजेबाचे प्रकरण सरकारच्या अंगाशी आले असे कोण म्हणते असे काही अंगाशी आलेले नाही. संजय राऊत बोलतात म्हणजे काही महाराष्ट्र बोलत नाही. त्यांची औकात काय आहे. 4 भितींच्या आत नालायकासारखी बकबक करणारा तो माणूस आहे. त्यांच्या बोलण्याला कोणी महत्त्व देत नाही. औरंगजेब हे प्रकरण एका विषयाचे नाही. हे शिवप्रेमींची देशभक्तांची भावना आहे. तो सरकारचा विषय नाही तो जनतेचा विषय आहे.

इतक्या वर्षानंतर याचिका का?- मिटकरी

अमोल मिटकरी म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणात इतक्या वर्षानंतर याचिका का दाखल करण्यात आली? 2020 साली मालाडमध्ये घडलेलं हे प्रकरण आहे. याची आता चर्चा होत आहे. इतक्या वर्षांनंतर ही याचिका दखल करण्याचे कारण काय? इतकी दिरंगाई का केली? तिच्या वडिलांनी तेव्हाच याचिका दखल केली असती, तर न्याय मिळाला असता. मग आता का हे प्रश्न काढले? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. तर दिशा सालियान प्रकरणात जे कोणी असतील त्यांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु दिशा सालियान प्रकरणामुळे महाराष्ट्राची दिशाभूल होऊ नये. राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन वातावरण भरकटवले जात आहे. हे महाराष्ट्र समोरचे प्रश्न नाहीत. राजकीय लोकांनी याला हवा देऊ नये. विरोधक आणि सत्ताधारी यांनी दिशा सालियन प्रकरणात महाराष्ट्राचे मूळ प्रश्नांना बगल देऊ नये.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अश्विनी चवरेचं वृत्तपत्र प्रिंट फॅशनचा जलवा

स्टाईल आयकॉनचा नवा अवतार – हटके आणि ट्रेंडी –...

आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा,दिशा सालियान प्रकरणावरुन नीतेश राणे आक्रमक

मुंबई-दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर...

दिशा सालियन आत्महत्या प्रकरण, वडिलांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका:आदित्य ठाकरेंविरुद्ध एफआयआरची मागणी

मुंबई-अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे वडील...