मुंबई-दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर आमदारकीचा राजीनामा देत चौकशीला सामोरे जायला हवे. ते आमदार असतील तर राजकीय दबाव निर्माण केल्यासारखे होईल, त्यामुळे आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा चौकशी होऊ द्यावी, असे भाजपचे नेते नीतेश राणे यांनी म्हटले आहे.नीतेश राणे म्हणाले की, हे जर आत्महत्या होती तर या प्रकरणी आदित्य ठाकरेंना का वाचवावे लागत आहे. त्यांची एवढी धावपळ का होत आहे. सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार जर बलात्काराचा आरोप असेल तर केस दाखल करावी लागते. म्हणून त्या नियमानुसार आदित्य ठाकरेंना अटक करत त्यांची चौकशी झाली पाहिजे.
नीतेश राणे म्हणाले की, सामान्य माणसांना जो न्याय लागतो तोच आदित्य ठाकरेंना लावला पाहिजे. त्यांची चौकशी करावी. त्यांचे जर ह्यात काही नसेल तर ते चौकशीत समोर येईल आणि आमचे तोंड बंद होतील. आदित्य ठाकरेंना जर विश्वास आहे की ही आत्महत्या होती तर त्यांनी पुरावे द्यावे आणि आम्हाला खोटे ठरवावे. आता दिशाचे वडील सांगत आहे की मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. किशोरी पेडणेकर आमच्यावर दबाव टाकत होत्या. दिशाच्या वडीलांनी त्यांचे नाव घेतले आहे, आम्ही घेतलेले नाही. हे सर्व कोर्टात सुरू आहे.
नीतेश राणे म्हणाले की, गेल्या 5 वर्षांमध्ये संजय राऊत यांचे मालक मुख्यमंत्री होते. त्यांचा मुलगा प्रकरणात असल्याने त्यांनी दिशाच्या वडीलांवर खूप दबाव टाकला होता. ते सांगत आहे की आमच्यावर दबाव होता. एका मुलीची हत्या झाली आहे, तिला न्याय मिळाला पाहिजे.यातून राजकीय नेत्याना बाहेर काढा. फक्त तिला न्याय मिळावा हीच भूमिका ठेवली पाहिजे. संजय राऊत एका मुलीचे वडील आहेत त्यांनी तर भूमिका घेतली पाहिजे की काय खरे आहे ते समोर आले पाहिजे. मी दिशाच्या आई-वडीलांसोबत आहे.