पुणे- महिला कारागृह पोलीस भरतीदरम्यान गोंधळ उडाला आहे. यावेळी लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुली आत घुसल्या. या गोंधळात अनेक मुली जखमी झाल्याची माहिती आहे.त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेची तयारी व्यवस्थित नसल्याने हा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं आहे.दरम्यान दीड महिन्यांपासून म्हणजेच 29 जानेवारीपासून पोलिस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सुरुवातीला 500-1000 उमेदवारांना बोलावले होते. त्यानंतर 1500 उमेदवारांना बोलावण्यात आले. आता 1500 विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी सुरू आहे. अत्यंत शांतपणे येथे प्रक्रिया सुरू आहे. आजपासून महिला उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे पालक आले होते. त्यामुळे साडेचार वाजता गर्दी जमली होती. पण चेंगराचेंगरी झालेली नाही. साडेचार वाजता उमेदवारांना आत घेण्यात आले आणि शिस्तीत भरती प्रक्रिया सुरू झाली, अशी माहिती पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.
आजपासून पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक तरूणी पुण्यात दाखल झाल्या आहेत. ५३१ कारागृह महिला पोलीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडते आहे. मात्र यासाठी तीन हजारांपेक्षा जास्त मुलींनी गर्दी केली. मात्र, यावेळी अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे गोंधळ उडाला.पोलीस प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेतील नियोजनात गोंधळ उडाला. गेटवर झालेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडले आणि त्यावरून मुली आतमध्ये पळत सुटल्या. यावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापती झाली.
या घटनेनंतर मुलींच्या पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. शिवाजी नगर पोलीस मुख्यालयात जो प्रकार घडला यावर पालकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी या पालकांची काही स्थानिक पोलिसांशी बाचाबाचीदेखील झाली.दरम्यान, ही भरती प्रक्रिया २०२२-२३ पासून रखडलेली आहे. ५१३ जागेसाठी ही रखडलेली भरती प्रक्रिया आता कुठे पार पडते आहे. असं असताना नियोजन नसल्याने या भरती प्रक्रियेला गालबोट लागल्याचं दिसून आलं आहे. या पोलिसांच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे मैदानी चाचणीमध्ये आपली मेहनत तर व्यर्थ जाणार नाही ना अशी भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसत आहे.