गृहमंत्र्यांना पोलिसांना सुरक्षित ठेवता येत नसेल तर राज्य कसे सुरक्षित ठेवणार?
मुंबई-नागपूरमध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर हात टाकल्याची बातमी येतेय. गृहखात्यासाठी ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना गृहमंत्री सुरक्षित ठेवू शकत नसतील तर राज्य सुरक्षित कसे सुरक्षित ठेवणार? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.सुषमा अंधारे म्हणाल्या की, नीतेश राणेसारख्या अतिशय भंपक, बेताल माणसाला जाणीवपूर्वक मोकळीक देणे ही फडणवीसांची पूर्वनियोजित योजना आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नागपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात 33 पोलfस जखमी झाले. ही दंगल सुरू असताना काही समाजकंटकांनी महिला पोलिसाचा विनयभंग केल्याच्या घटना समोर आली आहे. यावरुन अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
नागपूर मध्ये झालेल्या दंगलीवर आरोप प्रत्यारोप होत असतानाच आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये दंगल नियंत्रण करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या दंगली दरम्यान करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यापर्यंत या दंगेखोरांची मजल गेल्याने आता या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, नीतेश राणेसारख्या अतिशय भंपक, बेताल माणसाला जाणीवपूर्वक मोकळीक देणे ही फडणवीसांची पूर्वनियोजित योजना आहे का? नागपूरमध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर हात टाकल्याची बातमी येतेय. गृहखात्यासाठी ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना गृहमंत्री सुरक्षित ठेवू शकत नसतील तर राज्य सुरक्षित कसे सुरक्षित ठेवणार? विधानसभेत लाडक्या बहिणीची ढाल केली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मढी उकराताहेत? विकासाचं गाठोडं काय अरबी समुद्रात बुडवलं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, सध्या महाराष्ट्रात महापुरुषांची बदनामी करण्याची स्पर्धा लागली आहे.अशा वक्तव्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांना शिवसेना उबाठा पक्ष कदापिही माफ करणार नाही, असा इशारा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे. तर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या कोरटकर यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देणार असल्याचे सांगितले.