पुणे-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील स्वराज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेन्द्रा फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण सातत्याने परिश्रम घेऊ असे येथे महापालिकेचे माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी म्हटले आहे. जय भवानी जय शिवाजी या जयघोषात राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.तर पुणे शहराचा पूर्व भाग म्हणून ओळख असलेल्या सोमवारी पेठेतील विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुप चे आधारस्तंभ भाजपचे नेते पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर,तसेच विशाल दरेकर आणि संस्थापक अध्यक्ष शुभम पवार हे मागील तीन दशकांपासून भव्य दिव्य भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करीत आले आहेत.तर यंदाच्या वर्षी हिरकणी फेम सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शिवजयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून रसिक प्रेक्षकांची मन देखील जिंकली.
या कार्यक्रमा दरम्यान भाजपचे नेते माजी सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, सोमवारी पेठेतील विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुप च्या माध्यमांतून वर्षभर विविध उपक्रम हाती घेण्यात येतात आणि आपण वर्षभर ज्या दिवसाची वाट पाहत असतो,तो दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जगभरात शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी होत आहे.त्या प्रमाणेच आपल्या पुणे शहरातील पूर्व भाग म्हणून ओळखल्या जाणार्या सोमवारी पेठेत देखील मोठया उत्साहाच्या वातावरणात जयंती साजरी केली जात आहे.याबद्दल मला खूप आनंद होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक पिढीला प्रेरणा आणि संदेश देण्याच काम केल आहे.त्यामुळे मी आणि आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या मार्गावर काम करित राहिले पाहिजे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील जो महाराष्ट्र होता.जे स्वराज्य होत,ते सर्वांनी मिळून आणण्याचा प्रयत्न करावा,तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारच्या माध्यमातून तो प्रयत्न करीत असून या कामासाठी चळवळ उभारली गेली पाहिजे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
तसेच या कार्यक्रमा दरम्यान मर्दानी खेळाचे आणि सुरेख अशा मल्लखांब चे प्रात्यक्षिक तरुणांनी करून दाखविले.तर उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करीत प्रात्यक्षिक करणार्या मुलांचे कौतुक देखील केले.या सोहोळ्यास हर्षल दिघे ,ऋषिकेश मोहिते, मानव मोहिते ,शुभम पगारे, धवल मोहिते, अभिषेक गायकवाड, किशोर गायकवाड, प्रणय पगारे ,आर्यन पिसाळ सुमित रामबाडे,अजिंक्य शेळके, निखिल बहिरट ,वसीम शेख, हेमंत शिंदे सनी परदेशी,रोहित गरुड ,आनंद पाटील यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.