मुंबई-संघ परिवारातील निष्ठावंत असा लौकिक प्राप्त असलेल्या माधव भंडारींना विधानपरिषद उमेदवारी देताना पुन्हा डावलले आहे. भाजपने ३ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी दिली गेली आहे.भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे, यामुळे पुरेशी मते असल्याने हे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत.
विधान परिषदेवर आमश्या पाडवी यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ ७ जुलै २०२८ पर्यंत आहे. तर, राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा कार्यकाळ २७ जुलै २०३० पर्यंत आहे. भाजप नेते प्रवीण दटके यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ पर्यंत असून आमदार रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचाही कार्यकाळ १३ मे २०२६ पर्यंत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे सर्व आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विधान परिषदेच्या जागा रिक्त झाल्या . निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे.विधानपरिषदेच्या या ५ जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या या ५ जागांवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून २७ मार्च रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. यासाठी भाजपाने ३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांना पुन्हा डावलण्यात आले आहे.महायुतीत भाजपकडून ५ पैकी ३ जागांवर उमेदवार देण्यात येणार होते. तर एकनाथ शिंदे गट १ व अजित पवार गट १ अशा ५ जागा वाटून घेण्यात आल्या होत्या. दरम्यान १० मार्च ते १७ मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया असणार आहे. त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्यासह दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर यांची नावे प्रदेश पातळीवरून केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्यात आली होती.
माधव भंडारी यांचे नाव यापूर्वीही अनेकदा विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले होते. मात्र वारंवार चर्चा होऊनही अद्याप त्यांना विधिमंडळात संधी मिळालेली नव्हती. आता त्यांना संधी देऊन ज्येष्ठ नेत्यांना न्याय देण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र या निवडणुकीतही भाजपाने भंडारींना स्थान दिलेले नाही. भाजपने ३ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांची वर्णी लागली आहे. भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे, यामुळे पुरेशी मते असल्याने हे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत.
