२७२७ कोटीचे उद्दिष्ट पण वसुल झाले २१५० कोटीच.. आता महिलांचे ‘दामिनी’पथक देणार झुंज

Date:

पुणे शहरात कर संकलनाच्या अनुषंगाने दामिनी महिलांची 12 पथके तयार करण्यात आलेली आहे सदर प्रत्येक पथकामध्ये पाच महिलांचा समावेश असून त्यांचेमार्फत शहरातील थकबाकीदार मिळकतींची पाहणी करून वसुलीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे सदरचा प्रयोग हा प्रथमच राबवण्यात आलेला असून त्यासाठी अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे सदर पथकाकडून दहा लाख इतके रक्कम थकबाकी जमा करण्यात आली असून तीन मिळकती जप्त करण्यात आलेले आहेत

-उपायुक्त कर आकारणी कर संकलन प्रमुख माधव जगताप

उपायुक्त कर आकारणी कर संकलन प्रमुख माधव जगताप , महापालिका सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे , प्रशासन अधिकारीरवींद्र धावरे सर, प्रशासन अधिकारी सोपान वांजळे , प्रशासन अधिकारी श्रीमती.रजनी शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पेठ धायरी येथे मध्यवर्ती महिला वसुली पथक व टीम यांचे समवेत मिळकत कारवाईसाठी गेलेल्या पथकाने , मिळकतदाराकडून PDC व चालू चेकने रक्कम रुपये दहालाख रुपये वसूल केले.ही वसुलीमहिला पथक प्रमुख वंदना पाटसकर, प्रीती चव्हाण,शुभांगी खसासे वैशाली कामथे दिपाली चव्हाण गौतमी कोडम व सर्व विभागीय निरक्षक पेठ निरीक्षक चेतन मोकाशी यांनी केली.

आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता मिळकतकर थकबाकीची वसुली करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.यासाठी महिलांची १२ पथके स्थापन करण्यात आली असून, त्यात ६० महिलांचा समावेश आहे.पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २७२७ कोटी रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पण या वर्षात हे उद्दिष्ट साध्य होणार नसल्याचे जवळपास निश्‍चित झाले असून, आत्तापर्यंत २१५० कोटी रुपयेच वसुल झाले आहेत.त्यामुळे उर्वरित १५ दिवसात सुमारे ६५० कोटी रुपये कर वसुली करणे प्रशासनाला अशक्य आहे. पण या शेवटच्या १५ दिवसात जास्तीत जास्त कर वसुली करून ही रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्याचे प्रयत्न प्रशासनाचे सुरु आहेत.त्यासाठी महापालिकेकडून थकबाकीदारांना नोटिसा बजावणे, थकबाकीदाराच्या मिळकतीपुढे बॅंड वाजविणे, इमारती जप्त करणे, टाळे ढोकणे अशी कारवाई केली जात आहे. ही कारवाई आणखी प्रभावी करण्यासाठी खास महिला कर्मचाऱ्यांचे थकबाकी वसुलीचे १४ पथक तयार केले आहेत. त्यात ६० महिलांचा समावेश आहेत.

मिळकतकर विभागाचे उपयुक्त माधव जगताप म्हणाले, महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीच्या वसूलीसाठी आता कार्यालयात काम करणाऱ्या महिलांचीही नेमणूक करण्यात आली आहे. या कामासाठी ६० महिला कर्मचाऱ्यांची १२ पथके वसूलीसाठी नेमण्यात आली आहेत.महिला दिनाचे औचित्य साधत या महिलांवर ही वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे. हा प्रयोग प्रथमच करण्यात आला असून, पहिल्या दिवशी या पथकाने तीन मिळकती जप्त केल्या आहेत. तर १० लाख रुपयांची वसुली केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इंडिगो 1,000 हून अधिक पायलटची भरती करणार

मुंबई-देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो मोठ्या प्रमाणावर वैमानिकांची भरती...

रस्ते अपघात व सुरक्षेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : गोपाळकृष्ण पिल्लई

सरहदतर्फे डॉ. योगेश म्हसे, विशाल नरवडे, जहीरोद्दीन हुसेन शेख यांना स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मान प्रदान पुणे :  रस्त्यावरील अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असतानादेखील,देशभरात रस्त्यावर होणारे अपघात आणि रस्ते सुरक्षा या विषयांकडे गेल्या दोन दशकांपासून अक्षम्य दुर्लक्ष होत आले आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव गोपाळकृष्ण पिल्लई यांनी केली. सरहद पुणेच्या वतीने डॉ.माधवगोडबोले स्मृती व्याख्यान आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त प्रशासनात उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे  टिळक स्मारक मंदिरयेथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘हरवलेले सुशासन’ या विषयावर पिल्लई बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर होते. या प्रसंगी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त डॉ. योगेश म्हसे, सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, डिजीपी कार्यालयातील प्रमुख लिपिक जहीरोद्दीन हुसेन शेख यांना स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर सरहदचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे होते. पिल्लई म्हणाले, रस्ते सुरक्षा हा इतका गंभीर विषय असतानादेखील गेल्या तीस वर्षांत एकाही खासदाराने त्यावर संसदेत चर्चा केलेली नाही. कारण त्यांच्यादृष्टीने रस्ते सुरक्षा हा मते मिळवून देणारा विषय नाही. त्यामुळे त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. वस्तुतः दररोज नव्याने सहा हजार वाहने रस्त्यावर उतरत असतील, तर केवळ मोठे उड्डाणपूल बांधून किंवा मेट्रो तयार करून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी व्यापक विचारमंथन होऊन त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने हा विषय राजकीय दृष्टीक्षेपात कसा येईल, हे पुण्यातील सुजाण व विचारवंत लोकांनी पाहायला हवे. हा विषय अतिशय गंभीर असल्याने तो राज्यकर्त्यांच्या प्राधान्यक्रमावर यायला हवा. या विषयाचे स्वरूप इतके गंभीर झाले आहे की प्रशासन तरी कुठे-कुठे पुरे पडणार, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. २०४७ सालातील विकसित भारतहेलक्ष्य निर्धारित केले असून त्यासाठी अनेक चांगले प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत. परंतु ते राबवताना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचणे गरजेचे आहे. त्यातील मर्यादित पारदर्शकता दूर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पिल्लई यांनी केले. इडीमध्ये काम करताना पूर्ण स्वातंत्र्य : विवेक वाडेकर आयकर आयुक्त विवेक वाडेकर म्हणाले, आजच्या स्थित्यंतराच्या काळात प्रशासनाची भूमिका फार महत्त्वाची आहे. इडी हा विषय आपल्याकडे खूप चर्चिला जात असला, तरी २०२३ सालापर्यंत या विभागामध्ये मी प्रत्यक्ष काम केले आहे. मी कार्यरत असेपर्यंत तरी एकदाही कुठल्याही राजकीय नेत्याने कधीही फोन करून दबाव आणला नाही किंवा काही करण्यास प्रवृत्त केले नाही. आम्हाला काम करताना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले होते; फक्त चांगल्या गुणात्मक कामाची अपेक्षा होती. त्यामुळे राष्ट्रउभारणी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनीच जबाबदारीने काम करायला हवे. आपल्यातील शासक हरवत आहे, ही आजची खरी अडचण आहे. खरे प्रशासन म्हणजे तत्त्वनिष्ठता : योगेश म्हसे.. सत्काराला उत्तर देताना योगेश म्हसे म्हणाले की, प्रशासनातील मूल्यांवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान या पुरस्काराच्या रूपाने झाला आहे, असे मी मानतो. खरे प्रशासन म्हणजे तत्त्वनिष्ठता. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हा पुरस्कार अधिक लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्णय दृढ करेल, असा विश्वास मला वाटतो. जबाबदारी...

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात:उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक नाशिक, दि. 14...

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ४४ व्या फळे, फुले आणि भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त, उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या...