गांधींना मारणे म्हणजे लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न होता: अजित अभ्यंकर

Date:

पुणे:महात्मा गांधींनी भारतामध्ये लोकशाहीची जागा निर्माण करून दिली. तसे झाले नसते तर भारताचा हिंदू पाकिस्तान झाला असता. सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे हेच स्वप्न आहे, पण ते पूर्ण होणार नाही. गांधींना मारणे म्हणजे लोकशाहीची जागा नष्ट करण्याचा प्रयत्न होता, असे मत ज्येष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. धर्म म्हणजे अस्मिताबाजी आणि धर्म म्हणजे द्वेष हे नाकारयचे असेल आणि धर्मचिकित्सेची जागा ठेवायची असेल तर गांधी नावाचा अवकाश अनुभवला पाहिजे. जात, धर्म आणि लिंग द्वेषाचे वातावरणाविरोधात सर्वांनी मिळून लढले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
गांधी विचार साहित्य संमेलनात ‘जात, वर्ग आणि लिंग संघर्ष गांधीजींच्या दृष्टिकोनातून’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. धम्मसंगिनी रमा, समाजशास्त्रज्ञ डॉ. श्रुती तांबे या परिसंवादात सहभागी झाले होते. रोहन गायकवाड यांनी अभ्यंकर यांचा सत्कार केला. रेश्मा सांबारे यांनी तांबे आणि धम्मसंगिनी रमा यांचा सत्कार केला.
धम्मसंगिनी रमा म्हणाल्या, जात ही व्यवस्था आहे. जात आणि पुरुषसत्ता यातून स्त्रीदास्य निर्माण झाले. याबाबतचे मूलभूत चिंतन गांधींच्या विचारात दिसत नाही. जात कशी काम करते, या व्यवस्थेबद्दल गांधींच्या विचारात हाती काही लागत नाही. पण, त्यांच्या उदारमतवादी विचारांत नंतर काही मांडणी दिसू लागते. जात ही ग्रामस्वराज्याचा गाभा आहे. जात व्यवस्था ही उत्पादक रचना आहे. हा गांधींचा पूर्वीचा विचार होता. नंतर त्यात प्रागतिक विचारांमुळे बदल झाला असे मला वाटते. जातीअंत म्हणजे अस्पृश्यता न पाळणे हे प्राथमिक काम आहे आहे. पण, साधन , संपत्तीमध्ये वाटा आणि शासन व्यवस्थेत स्थान असले पाहिजे. देशात जातीच्या वस्त्या आहेत. इथे लोकांना का राहावे लागते, याचे मूलभूत चिंतन गांधी विचारांचे सरकार सत्तेत असताना झाले नाही.
तांबे म्हणाल्या, धर्मावरून जगात दुफळी माजली आहे. भांडवलशाही वापरून जात, धर्माआधारे सत्ता राबवली जात आहे. ८५ टक्के आदिवासी विस्थापित झाले आहेत. विकासाच्या प्रक्रियेने त्यांना भिरकावून लावले आहे. जंगले उद्ध्वस्त झाली आहेत. हा आदिवासी आज शहरांत मेट्रोचे काम करत आहे. अशा वातावरणात माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळणार आहे का नाही ? गांधींमध्ये विरोधाभास होता पण कृतिशील लोकांच्या बाबतीत हा धोका असतो. गायपट्ट्यातील कर्मठ लोकांना घराबाहेर आणण्याचे काम गांधींनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिला दिनाच्या निमित्ताने सह्याद्रि हॉस्पिटल तर्फे वॉकथॉन

पुणे-आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, सह्याद्रि सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखानाने एक...

सध्याचा काळ हा जगासाठी कठीण काळ,गांधी पुन्हा जन्म घेतील-ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे प्रतिपादन

पुणे : अमेरिकेत डोनॉल्ड ट्रम्प, चीनमध्ये क्षी जिनपिंग, रशियात...

स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पुण्यात संपन्न

रेडबेल मीडिया प्रस्तुत नवीन सिनेमाची घोषणा पुणे : मराठी चित्रपटसृष्टीत...