कोणत्याही जाती, धर्माचा शिक्का नसलेले बापू एकमेव नेते: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांचे प्रतिपादन

Date:

पुणे : सर्व नेत्यांवर जात आणि धर्माचे शिक्के लागले आहेत. कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा वापर केला नाही किंवा हे या अमुक जाती, धर्माचे नेते नाही, असे एकमेव नेते म्हणजे महात्मा गांधी आहेत. बापूंवर कोणत्याही जाती, धर्माचा शिक्का नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी शनिवारी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे कोथरूड येथील गांधी भवन परिसरात आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनातील दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात ‘हिंदू – मुस्लिम प्रश्न आणि गांधीजी’ या विषयावरील परिसंवाद ते बोलत होते. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते इरफान इंजिनीअर, लेखक आणि पत्रकार किशोर बेडकीहाळ यांनी या परिसंवादात भाग घेतला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन अध्यक्षस्थानी होते. सुनील पाटील यांच्या हस्ते किशोर बेडकीहाळ आणि अन्वर राजन यांचा सत्कार करण्यात आला. मिलिंद गायकवाड यांच्या हस्ते इंजिनीअर यांचा सत्कार करण्यात आला.
गांधी म्हणाले, जिना, सावरकर, अडवाणी आणि मोदी यांना विशिष्ट समाजाचे नेते म्हणून ओळखले जाते. बापूंवर असा शिक्का मारता येत नाही. बापूंवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करण्यात आला आणि या तुष्टीकरणाला तर आता देशद्रोहाचे स्वरूप देण्यात आले आहे. काही लोक बापूला शत्रू आणि नथुरामला दिव्य मानतात. त्याची पूजा केली जात आहे. या लोकांवर बोलणे गरजेचे आहे. घरी सर्वधर्मीय लोक यायचे त्यातून बापूंवर सर्वधर्माचा संस्कार झाला. मोहनदासचे महात्मा कसे झाले याचा अभ्यास केला पाहिजे. गांधींना आजचे मापदंड लावून चालणार नाही. त्यांना मोजण्यासाठी हे मापदंड पुरेसे नाहीत. बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत तर तिथे एकही नेता गेला नाही. हिंदू सुरक्षित नसतील किंवा मुस्लिम सुरक्षित नसतील तर बापू तिथे जायचे आणि हल्ला करणाऱ्यांना खडसावायचे. अशा प्रकारचे राजकारण आज कोणता नेता करेल ? देशात विभाजनाचे राजकारण सुरू असून आपण हिंदू आणि मुस्लिम असे बोलण्यापेक्षा भारतीय म्हणून बोलले पाहिजे.
बेडकीहाळ म्हणाले, गांधींवर खिलाफत चळवळ आणि मुस्लिम अनुनयाचा आरोप करण्यात येतो. गांधी भारतात येण्यापूर्वी बंगालची फाळणी झाली होती. जागतिक पातळीवरच्या मुस्लिमांचे नेतृत्व म्हणून तुर्कस्थानच्या खलिफाकडे पाहिले जात होते. ब्रिटिशांमुळे त्याचे स्थान धोक्यात आल्याने जगभरातील मुस्लिमांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. मुस्लिम समाजामध्ये ब्रिटिशांविरोधात असंतोष निर्माण करण्याची ही संधी आहे, असे गांधीजींनी मानले. हिंदू-मुस्लिम एकजुटीचा सर्वात चांगला कालखंड लखनौ करारानंतर १९२२ ते १९३७ पर्यंतचा आहे.
इंजिनीअर म्हणाले, ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी हिंदू- मुस्लिम प्रश्न तणावाचा नव्हता. ब्रिटिशांनी सत्ता राबविण्यासाठी हा झगडा निर्माण केला. त्यानंतर मुस्लिम लीगला ताकद मिळाली. गांधी ही नैतिक शक्ती आहे. सर्व धर्मांत सत्य आहे, असे गांधींना वाटायचे. ईश्वर हे सत्य नाही तर सत्य हाच ईश्वर आहे, असे त्यांनी सांगितले. गांधींनी सत्याचा पाठलाग करायला सांगितला.
अध्यक्षीय भाषणात अन्वर राजन म्हणाले, महात्मा गांधींचे व्यक्तिमत्त्व धार्मिक होते, पण त्यांना कोणत्या एका धर्मात बसवता येणार नाही. जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील कोकण , मराठवाडा येथील मुस्लिम वेगळे आहेत. मुस्लिमांमध्ये वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती आहेत. त्यांच्या संस्कृतीमध्ये स्थानिक संदर्भ आहेत. गांधींच्या चळवळीत महिलांचा सहभाग सर्वाधिक होता. त्याआधी आणि नंतर तेवढा सहभाग नव्हता. स्वाती महाळंक यांनी सूत्रसंचालन केले. कमलाकर शेटे यांनी आभार मानले.


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गांधींना मारणे म्हणजे लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न होता: अजित अभ्यंकर

पुणे:महात्मा गांधींनी भारतामध्ये लोकशाहीची जागा निर्माण करून दिली. तसे...

महेश मांजरेकर यांची ‘फिल्टर कॉफी’

कॉफीची नजाकत काही वेगळीच! मग ती कोल्ड असो वा...

‘फुले कृषी सावित्री जत्रा’ उपक्रमाला खासदार सुनेत्रा पवार यांची भेट

पुणे, दि.८: पुणे जिल्हा परिषद आणि शासकीय कृषी महाविद्यालय...

पिंक रिक्षा योजनेमध्ये एक हजार महिलांच्या सहभागासाठी प्रयत्न करणार : आशा कांबळे

पिंपरी ! प्रतिनिधी महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी प्रयत्न...