८ मार्च २०२५ – आंतरराष्ट्रीय महिला दिनी उद्घाटन
मुंबई, दि. 6 मार्च
राष्ट्रीय महिला आयोगाच्या मार्गदर्शनाखाली बृहनमुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने भारतीय स्त्री शक्ती तर्फे मुंबईमध्ये तीन ठिकाणी ‘विवाह पूर्व संवाद’ केंद्र सुरू होत आहेत.
विवाह हा स्त्री आणि पुरुष दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. विवाहानंतर दोघांचं नातं हे जर सशक्त असेल तरच ते यशस्वी होते. आज आपण फॅमिली कोर्टात तरुण मुलामुलींची कौटुंबिक वादाच्या व घटस्फोटाच्या खटल्यांची जी आकडेवारी बघतो आहोत ती चिंताजनक आहे. ह्याला आळा घालण्यासाठी ‘विवाहपूर्व कुटुंब संवाद केंद्रांची’ मोठ्या प्रमाणात गरज आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी अशी ‘विवाहपूर्व कुटुंब संवाद केंद्र’ देशभरात सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने भारतीय स्त्री शक्ति तर्फे मुंबईमध्ये परेल, विले पार्ले आणि बोरीवली अश्या तीन ठिकाणी ‘विवाह पूर्व संवाद’ केंद्र सुरू केले जाणार आहेत.
भारतीय स्त्री शक्ति १९८८ पासून महिला आणि कुटुंबांच्या सशक्तीकरणाचे काम करीत आहे. या अंतर्गत भारतीय स्त्री शक्ति तर्फे ‘कुटुंब सल्ला केंद्र’ तसेच ‘विवाह पूर्व मार्गदर्शन कार्यशाळा’ असे अनेक उपक्रम राबविले जातात, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकारी सीमा देशपांडे यांनी दिली.
संपर्क नंबर
+91 90829 65051