मी कोणत्याही महापुरुषाबाबत अपशब्द बोललो नाही:कोणी दुखावले असेल तर माझे विधान मागे घेतो, औरंगजेबाच्या विधानावरून अबू आझमींचा यू-टर्न

Date:

मुंबई-समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दले केलेले विधान मागे घेतले आहे. माझ्या शब्दांचा विपर्यास केल्याचे ते म्हणाले. मी बोलताना कोणत्याही महापुरुषांबाबत अपमानजनक वक्तव्य केले नसल्याचेही आझमी यांनी स्पष्ट केले. या मुद्द्याला राजकीय मुद्दा बनवले जात असल्याचा आरोपी अबू आझमी यांनी यावेळी केला. अबू आझमी यांनी त्यांचे विधान मागे घेतल्यानंतर हा वाद संपणार का? हे पाहावे लागणार आहे.अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. एकनाथ शिंदे यांनी तर अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आज विधानसभेतही अबू आझमींच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे सभागृहाचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. या सर्व घटनांनंतर अबू आझमी यांनी आपल्या औरंगजेब बद्दलच्या विधानावर स्पष्टीकरण दिले.

आझमी म्हणाले की, जेव्हा मी विधानसभेतून बाहेर आलो आणि पत्रकारांशी बोललो, तेव्हा पत्रकारांनी मला आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींची औरंगजेबाशी केलेली तुलना यावर प्रतिक्रिया देण्यास सांगितले, ज्यावर त्यांनी इतिहासकारांनी जे म्हटले आहे तेच पुन्हा सांगितले. जेव्हा इतिहासकारांवर बंदी नाही, तर त्यांच्या विधानावर इतका गोंधळ का होत आहे? असा प्रश्नही अबू आझमी यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे स्पष्ट केले की ते कधीही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा डॉ. आंबेडकर यांचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाहीत. ते म्हणाले की, अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधाने केली, परंतु त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला आहे. औरंगजेब रहमतुल्लाह अलेह बद्दल, जे इतिहासकार आणि लेखकांनी म्हटले, तेच मी म्हटले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल कोणतेही अपमानजनक भाष्य केलेले नाही. परंतु तरीही माझ्या विधानामुळे कोणी दुखावले असेल तर मी माझे शब्द, माझे विधान मागे घेतो, असे अबू आझमी म्हणाले.या मुद्द्याला राजकीय मुद्दा बनवले जात आहे आणि यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद करणे म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचे नुकसान करणे आहे, असे मला वाटते, असेही अबू आझमी म्हणाले.
औरंगजेबाबत बोलताना काय म्हणाले होते आझमी?
मोगल बादशहा औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्यात व छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती. उलट त्याच्याच काळात भारताला सोन्याची खाण म्हणून संबोधले जात होते, असा वादग्रस्त दावा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला आहे. औरंगजेबाची कबर खोदण्याबद्दल बोलणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत. सद्यःस्थितीत महाराष्ट्रासह देशात मुस्लिमांवर अत्याचार वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.

औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24 टक्के एवढा होता. भारताला त्यावेळी ‘सोने की चिड़िया’, असे म्हटले जात होते. असे असताना चुकीचे म्हणू का? छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबची लढाई झाली, ती राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्मचारी, माजी सैनिक आणि अग्निवीरांना बीओआय रक्षक सॅलरी पॅकेज देण्यासाठी बँक ऑफ इंडियाने भारतीय सैन्यासोबत सामंजस्य करार केला

मुंबई, 6 मार्च 2025: भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ...

एयर इंडियातर्फे इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी ‘झिपअहेड’ प्रायोरिटी चेक- इन आणि बॅगेज हँडलिंग सेवा

·         प्रायोरिटी चेक- इन आणि प्रायोरिटी बॅगेज हँडलिंगसाठी सशुल्क सेवा ·         सहा...