पुणे, दि. ३ मार्च: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे १८ व्या राष्ट्रीय पातळीवरील एमआयटी डब्ल्यूपीयू आंतर-विद्यापीठ व महाविद्यालय ‘समिट-२०२५’ क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेला ८९ पदक मिळाले. तर उपविजेतेपद एमआयटी एडीटी पुणे ला ४६ पदक मिळाले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या संघाला करंडक व रोख पारितोषक देण्यात आले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी. पुणे तर्फे, २५फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राष्ट्रीय पातळीवरील एमआयटी डब्ल्यूपीयू आंतर-विद्यापीठ व महाविद्यालय ‘समिट-२०२५’ चा पारितोषिक वितरण समारंभ कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आला..
स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण प्रसंगी अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कार सन्मानीत पै.सुजित मान हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डाॅ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाने हा समारंभ संपन्न झाला.
या प्रसंगी माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव प्रा.गणेश पोकळे, प्रा.पद्माकर फड, डब्ल्यूपीयच्या क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक प्रा. विलास कथुरे व प्रा.अभय कचरे, प्रा.रोहित बागवडे हे उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
समिट २०२५ मध्ये देशभरातील १५० पेक्षा अधिक संघाच्या माध्यमातून २२०० विद्यार्थ्यांनी एकूण ९ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. विजेत्यांना करंडक, पदके, प्रशस्तीपत्र व रोख रूपये रकमेची पारितोषिके देण्यात आली.
या स्पर्धेमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धीबळ, कबड्डी व ई स्पोर्टस अशा एकूण ९ क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक क्रीडा प्रकारातील विजेत्या संघाला करंडक, सुवर्ण पदक व रोख पारितोषिक. या खेरीज उपविजेत्या संघाला करंडक, रौप्य, पदक व रोख पारितोषिक देण्यात आले.
पै. सुजित मान म्हणाले, कठोर परिश्रम, समर्पण आणि प्रयत्न हे तीन गुण खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याच जोरावर ते यशस्वीतेचे शिखर गाठू शकतात. कोणताही क्रीडा प्रकार हा केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. यामध्ये सहभागी खेळाडू हे देशातील सर्व भागातून आल्यामुळे ते एकतेचे ही प्रतिक आहे.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, विद्यार्थ्यांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम, मानसिक दृष्टया सतर्क, बौद्धिकदृष्ट्या चाणाक्ष, आध्यात्मिकदृष्ट्या सजग असावे. शिस्त आणि चरित्र्य या दोन गोष्टींना जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव याची जाणीव ठेवावी. देशासाठी हे अत्यंत महत्वाचे असून यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते.
या प्रसंगी क्रीडा विभागाचे निखील वणवे, राहुल बिराजदार व सहकारी हे उपस्थित होते.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण केले.
विद्यार्थी आदित्य गलगली व स्निग्धा खुशवाह यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.
अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कार सन्मानित पै. सुजित मान यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
Date: