मोदी,संघ राजवटीत देशाचे भवितव्य धोक्यात :डॉ.बाबा आढाव 

Date:

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित आगामी गांधी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाने तयार केलेल्या  विशेषांकाचे प्रकाशन रविवार,दि.२ मार्च २०२५ रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव,राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजा कांदळकर यांच्याहस्ते झाले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि 

‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे संपादक डॉ.कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.हा कार्यक्रम गांधी भवन,कोथरुड येथे दि.२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता झाला.गांधी विचार साहित्य संमेलन विशेषांकाचे गांधी भवन येथे दि.७ ते ९ मार्च २०२५ रोजी होणार असून त्यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या या  विशेषांकात गांधीजींच्या जीवन आणि संदेशाविषयी लेखन समाविष्ट करण्यात आले आहे.यावेळी लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, राजा कांदळकर आणि एड.राजेश तोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अभय देशपांडे यांनी केले तर गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन यांनी आभार मानले. 

डॉ.बाबा आढाव म्हणाले,’सध्या लोकशाही प्रचंड प्रमाणात धोक्यात आली असून आता जर सामान्य जनता जागी होऊन संविधान रक्षण केले नाही ,तर इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही.आजच्या मोदी आणि आर एस एस च्या विचाराने चाललेल्या देशात भारताची लोकशाहीच नव्हे तर देशाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी संविधान रक्षण करण्यासाठी खारीचा वाटा उचलावा एवढेच कळकळीने सांगण्यासाठी मी या वयातही आवर्जून आलो. लोकशाही संपुष्टात आणून हुकूमशाही आणली आहे आणि दडपशाही आणण्यासाठी लोकांना खिरापती वाटणे, ते न जमल्यास लोकांचे आवाज दडपणे, असे प्रकार मोदी सध्या सर्रास करत आहेत, त्यासाठी त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत’, असेही बाबा आढाव म्हणाले.

‘महात्मा गांधी यांचे विचारच आजच्या देशातील परिस्थितीवर खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरतील,याचसाठी गांधी विचारांचा यज्ञ म्हणून हे तीन दिवसीय साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे’,अशी माहिती कुमार सप्तर्षी यांनी यावेळी दिली.तरुणांनी या तीन दिवसीय साहित्य संमेलनाकडे खुल्या मनाने यावे,यासाठीची पूर्वतयारी म्हणून हा गांधी विचारांचा मागोवा घेणारा विशेषांक प्रकाशित करण्यात आला असल्याची माहिती यावेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली. 

‘डॉ.कुमार सप्तर्षी यांचे विचार आणि कार्य पथदर्शक असून डॉ.सप्तर्षींमुळेच मी सामाजिक,राजकीय चळवळीत आलो,असे राजा कांदळकर यांनी सांगितले.आजच्या देशातील परिस्थितीवर मात करायची असेल तर साने गुरूजींचे विचार आठवावे लागतील .’देशातील जाती धर्मातील बंधुभाव जोवर जिवंत राहील तोवरच लोकशाही टिकेल’,असे साने गुरुजी म्हणाले होते. म्हणूनच देशातील बंधुभाव पूर्णतः नष्ट करण्याचे सर्व प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. ते हाणून पाडण्यासाठी आपल्याला बंधुभाव एकात्मता आणि समता कायम ठेवावी लागेल’, असे मत कांदळकर यांनी व्यक्त केले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...