पंडित कुमार गंधर्व महोत्सवातून अनाहत नादाची अनुभूती:गायन, नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

Date:

विदुषी सानिया पाटणकर, पंडित सत्यशील देशपांडे, डॉ. पुष्कर लेले, अरुंधती पटवर्धन यांचा सहभाग

पुणे : अनाहत नादाची अनुभूती देणाऱ्या शतकातील महान गायक पंडित कुमार गंधर्व यांची गायकी सांगीतिक महोत्सवातून उलगडली. महोत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आज (दि. 26) पंडित कुमार गंधर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बालशिक्षण मंदिराजवळील एमईएस सभागृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात विदुषी सानिया पाटणकर यांचे बहारदार गायन झाले तर डॉ. पुष्कर लेले यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजनाची वैशिष्ट्ये उलगडली. पंडित सत्यशील देशपांडे यांनी पंडित कुमार गंधर्वांच्या सांगीतिक विचारांवर भाष्य करत सादरीकरणही केले.
महोत्सवातील पहिले पुष्प जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी सानिया पाटणकर यांनी गुंफले. त्यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग श्रीमधील मध्यलय झपतालातील ‌‘हरि के चरण कमल‌’ या बंदिशीने केली. अनवट रागातील ही बंदिश सहजतेने फुलवत नेत पाटणकर यांनी आपल्या गायकीवरील प्रभुत्व दर्शविले. गुरू अरविंद थत्ते यांनी याच रागात बांधलेली अनोखी सरगम सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली. अंशुलप्रताप सिंग (तबला), माधव लिमये (संवादिनी) तर वेदवती परांजपे, आदिती नगरकर, रुची शिरसे यांनी स्वरसाथ केली.
दुसरे पुष्प गुंफताना डॉ. पुष्कर लेले यांनी कल्याण रागातील पंडित कुमार गंधर्व रचित शिवाचा जपस्वरूप असणारी ‌‘शिव शिव कल्याण करे‌’ ही बंदिश ताकदीने सादर केली. पंडित कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजन गायकीचे अनोखे दर्शन घडविताना डॉ. लेले यांनी ‌‘माया महा ठगनी हम जानी‌’ हे संत कबिर यांचे भजन अतिशय भावपूर्ण स्वरात सादर केले. गौतम टेंबेकर (तबला), माधव लिमये (संवादिनी) आणि रोहन पोळ यांनी स्वरसाथ केली.
पंडित कुमार गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सत्यशील देशपांडे यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगीतिक विचारांवर भाष्य करताना कुमारजींच्या नजरेतून विविध रागांचे चलन, रागरूप यांचे अनोखे दर्शन घडविले. कुमारजींना पारंपरिक संगीत अमान्य नव्हते तर कुमारजींचे वेगळेपण म्हणजे या संगीतात ते अजून काहीतरी नाविन्य शोधत परंपरेचे परिशीलन करीत असत, असे सांगून राग दरबारीची झलक तसेच केहन ऐकविली. पंडित बबनराव हळदणकर यांनी रचलेला ‌‘दिम दिम तन न दे रे ना‌’ हा तराणाही ऐकविला. जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्याचे गायन वैशिष्ट्य दाखवून कुमारजींच्या मोरपंखी अलवार गायनाचे पदर उलगडले. प्रत्येक रागात अष्टांगाचे दर्शन घडविणे अपेक्षित नसते तर बंदिशीला पूरक अंग वापरणे महत्त्वाचे असते, ज्यातून गायन या हृदयीचे त्या हृदयीला भिडते असे सांगून नंद रागातील ‌‘ढुंढा बारी सैय्या‌’ या बंदिशीची झलक ऐकविली. कुमारजींचे गायनातील सखोल विचार ऐकून आणि पंडित सत्यशील देशपांडे यांच्या सादरीकरणातून नवकलाकारांना रागाकडे पाहण्याची अभ्यासक दृष्टी मिळाली.
कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना अरुधंती पटवर्धन आणि त्यांच्या शिष्यांनी गुंफले. त्यांनी सादरीकरणाची सुरुवात गणेशवंदनेने केली. हिंदुस्तानी संगीतावर आधारित रचना सादर करताना कालिमातेची स्तुती, ‌‘शिव शिव महादेव‌’ हे शिवध्रुपद ताकदीने सादर केले. कार्यक्रमाची सांगता पंडित कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेल्या ‌‘गुरुजी मै तो एक निरंजन‌’ या निर्गुणी भजनावर नृत्याविष्कार सादर करून कलाकारांनी रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमास लेखाअधिकारी नरेंद्र तावडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माधुरी सहस्रबुद्धे, उज्ज्वल केसकर, ॲड. मिताली साळवेकर, सिद्धार्थ काक, सानिया पाटणकर, नितीन महाबळेश्वकर, पंडित सत्यशील देशपांडे, पुष्कर लेले आणि अरुंधती पटर्वधन यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. मान्यवर व कलाकारांचे स्वागत सानिया पाटणकर, नितीन महाबळेश्वरकर, संजय पायगुडे, क्रांतीशिला ठोंबरे यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...