प्रामाणिक माणसेच व्यवस्था बदलू शकतात: ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि मुख्य संयोजक संजय नहार यांचे प्रतिपादन

Date:

दिल्ली, २४ फेब्रुवारी २०२५ : “प्रामाणिक माणसे इतिहास घडवतात. अशा माणसांचा इतिहास लिहल्यास त्यांच्या कार्याला न्याय मिळतो. हीच माणसे व्यवस्था बदलू शकतात. आणि म्हणूनच व्यवस्था बदलासाठी आपल्या चांगुलपणाची जाणीव होणे महत्वाचे असते.”  असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि मुख्य संयोजक संजय नहार यांनी केले. दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वर  आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील छत्रपती संभाजी महाराज खुल्या अभिव्यक्ती मंचावर यावेळी ते बोलत होते. 
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खुल्या अभिव्यक्ती मंचाचे संयोजक डॉ. शरद गोरे, शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप पाटील, तुकाराम महाराजांचे वंशज रामदास मोरे, कवी युवराज नळे, विक्रम मालन आप्पासो शिंदे, कवी अमोल कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.
संजय नहार म्हणाले, “उपेक्षित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी विचारमंच दिलाच पाहिजे. ही साहित्याची प्रचलित व्यवस्था बदलायची असेल तर सामान्य माणसाची लढाई ही सन्मानाची आहे. साहित्यिकांचे विचार आणि कृती सारखी असेल तरच त्याचे समाज व्यवस्थेमध्ये योगदान लाभू शकते. शरद गोरे हे संत नामदेवांच्या मार्गाने विद्रोह करणारे असून साहित्यिकांसाठी त्यांनी हक्काच विचारपीठ निर्माण केले आहे. बंडखोरी ही आपली ताकद आहे. साहित्यिक बंडखोरच असले पाहिजेत. “प्रदीप पाटील म्हणाले,” सत्कार्याचे काम करत असताना लोकं त्याच्यावर शिंतोडे उडवत असतात.  सर्व महापुरुषांनी हा सर्व छळ सहन केला म्हणून त्यांना अमरत्व प्राप्त झालं. साहित्यातून समाज उपयोगी कार्य करत रहा. आपल्या मराठीचा डंका आता साहित्यिकच अटकेपार नेऊ शकतो.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध साहित्यिक रमेश रेडेकर यांनी केले. प्रास्ताविक मराठा महासंघाचे गणेश दिवेकर यांनी केले. आभार  विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी मानले. 
” ज्ञानोबांचा जागर या संमेलनात झाला ही अभिमानाची बाब आहे. मात्र संत तुकाराम महाराजांचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान हे सर्वोच्च असून देखील त्यांची या संमेलनात प्रतिमा किंवा प्रतिकृती कुठेच लावली नाही. त्याचबरोबर कोणत्याच सभामंडपाला त्यांचे नाव देखील दिले नाही. याची खंत आहे.”           – रामदास मोरे, तुकाराम महाराजांचे वंशज.

हे साहित्य संमेलन अभूतपूर्ण होण्यामागे संजय नहार यांचे योगदान आहे. संमेलन कसे असावे याचा वस्तुपाठ  नहार यांनी देशाला दाखवून दिला. साहित्य संमेलनाचा हेतू हा माणसांना जोडणारा असावा. साहित्य क्षेत्रातील विपरीत गोष्टी बाजूला काढून साहित्य क्षेत्रात शुद्धीकरण करण्याचं काम संजय नहार यांनी केले.”           – डॉ. शरद गोरे, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्वेनगर दुर्घटनेतील जखमी रुग्णाची महापौर मंजूषा नागपूरे यांनी दीनानाथ रुग्णालयात घेतली भेट

पुणे :कर्वेनगर येथील मेघराज सोसायटीसमोर झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी...

नदीपात्र खराब करणारांवर तातडीने कडक कारवाई करा – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे- पुण्याच्या नदीपात्रात कचरा , राडारोडा टाकून अगर अन्य...

तिसऱ्या तिमाहीत भारत फोर्ज ला संरक्षण क्षेत्रातील १,८७८ कोटी रूपयांच्‍या ऑर्डर्स

भारत फोर्जकडून आर्थिक वर्ष २०२६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत प्रबळ...