पुणे-दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या पहिल्या दिवशी परिक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने रांगोळी व औक्षणासह सनई चौघड्याच्या जयघोषात मंगलमय वातावरणात गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले. बाजीराव रोडवरील नुमवि प्रशालेत हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी म.न.वि.से.राज्य कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ म्हणाले, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे मोठे दडपण असते. हे दडपण कमी झाल्यास ते उत्तम कामगिरी करू शकतील, या भूमिकेतून गेल्या ८ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत.
यावेळी नुमविचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, माजी नगरसेविका सुशीला नेटके, आशिष देवधर, गणेश भोकरे, ज्योती वसंत खुटवड, आरती रवि सहाणे, रुपेश चांदेकर, करण मेहता, दिलीप वाघमारे, सुरेश सांबार, ऋषिकेश करंदीकर, जयश्री पाथरकर, प्रतिक्षा रणधीर, विजय रजपूत, निखिल रजपूत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन म.न.वि.से.चे राज्य कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ यांनी केले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचे परिक्षा केंद्रावर मंगलमय वातावरणात स्वागत…
Date:

