मुंबई- महिला सक्षमीकरनासाठी एक पाऊल पुढे टाकत राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा अजितदादा पवार यांनी जवळपास तीन हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
आठ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ लवकरच जगभर साजरा केला जाईल मोठ्या मोठ्या भाषणात आणि लेखात महिला सक्षमीकरणाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातील पण एक महिला महिलांसाठी काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बारामती हाय-टेक्सटाईल्स पार्क असल्याचा दावा करण्यात येतो आहे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांअंतर्गत असलेल्या उमेद या कार्यालयामार्फत बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार सुनेत्रा पवार म्हणाल्या कि,’ या प्रदर्शनात बारामती हाय-टेक्सटाईल्स या कंपनीचा माहिती देणारा स्टॉल लावण्यात आला आहे या स्टॉल ला भेट दिली त्यावेळी महिलांना रोजगार देण्याबाबत सुरु असलेल्या या कामाची व्याप्ती समजली.
महिलांना कायम रोजगार मिळावा त्यांच्या हाताला काम मिळावे या हेतूने बारामतीत आपल्या माध्यमातून जवळपास मागील पंधरा वर्षापासून विविध कामे सुरु आहेत. बारामती येथील एमआयडीसी मध्ये हजारो महिलांना प्राधान्याने काम दिली जात आहेत.याच भागात मागील पंधरा वर्षांपूर्वी बारामती हाय-टेक्सटाईल्स लिमिटेड हा प्रकल्प केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या एस.आय.टि.पी योजनेअंतर्गत विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पात गारमेंट्स’ची सोळा युनिट चालू करण्यात आलेली आहेत यामध्ये प्रसिद्ध कॉटन किंग तसेच पेपरमिंट अशा अनेक नामाकिंत कंपन्यांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील जवळपास तीन हजारापेक्षा जास्तीच्या महिलांना या पार्क मधील विविध कंपन्यातुन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आणि या सर्व कंपन्याच्या माध्यमातून जवळपास प्रत्यक्ष अप्रतेक्ष असा पाच हजार महिलांना कायमचा रोजगार उपलब्ध झाला आहे. महिला सक्षमीकरणसाठी खऱ्या अर्थाने उचलले हे एक पाऊल असल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय वाहिनी नेहमीच अग्रेसर असतात. महिलांच्या उपजत गुणांना वाव दिला तर कोणतीही महिला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होते या विश्वासाने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिलांच्या हाताला काम दिले तर उत्कृष्ट निर्मिती होऊ शकते या विश्वासाने बारामती या टेक्स्टाईल्स कंपन्यांनी दाखवून दिले आहे. आज अनके नामांकित कंपन्यांमध्ये महिलांना काम दिले जात आहे त्यांच्या राहत्या गावापासून कारखाण्यापर्यंत सुरक्षित ने आण करण्याची जबाबदारी देखील या कंपंन्यांवर देण्यात आली आहे. गावाजवळ रोजगार मिळाल्याने महिला आर्थिक स्वावलंबी बनल्या आहेत.निसर्ग संवर्धन आणि त्याबाबत जनजागृती करण्याच्या उदात्त हेतूने आदरणीय वहिनींच्या मार्गदर्शनाखाली एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया हि सामाजिक संस्था देखील चालवली जाते. ज्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.वृक्षलागवड हा त्यातील प्रमुख उपक्रम आहे. काटेवाडी हे गाव ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम क्रमांकावर आहे तसेच हे गाव निसर्ग संवर्धनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वृक्ष प्रेम संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. बारामती आणि आजूबाजूची गावे झाडांनी हिरवीगर्द झाली आहेत याचे श्रेय देखील सुनेत्रावहिणी यांनाच जाते.केवळ रोजगार निर्मितीत नाही तर आरोग्य क्षेत्रात देखील हजारो लोकांच्या डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया बारामती करण्यात आल्या आहेत. मात्र या सर्व प्रसिद्धी पासून दूर राहून अनेक लोक उपयोगी जनसेवेसाठी अखंड काम वहिनींच्या माध्यमातून सुरुच आहेत. यातील अनेक कामे वाखाणण्याजोगी आहेत.समाजातील प्रत्येक महिला स्वावलंबी सुरक्षित आणि रोजगारक्षम झाली पाहिजे यासाठी खासदार सुनेत्रा वाहिनी पवार यांनी सुरु केलेले हे काम राज्यासाठी दिशादर्शक आणि महिला सक्षमीकरणासाठी पुढचे पाऊल ठरेल असा विश्वास आहे.