तेव्हा नियम तपासण्यासाठी वेळ मिळाला नाही. आता मात्र वेळ आहे त्यामुळे तपासणी करून अपात्र महिलांचा लाभ बंद करू
पुणे : लाडकी बहीण योजना लागू करताना अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना लाभ द्यायचा होता. तेव्हा नियम तपासण्यासाठी वेळ मिळाला नाही. आता तपासणी करून अपात्र महिलांचा लाभ बंद केला जाईल. मात्र, यापूर्वी लाभ घेतलेल्या महिलांचे पैसे परत घेण्यात येणार नाहीत, असे पालकमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर बोलताना पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजना जूनमध्ये जाहीर केली. या योजनेचे पैसे ऑगस्टनंतर देण्यास सुरुवात करून नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्यांचे पैसे दिले. चारचाकी, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना योजनेचा लाभ बंद करणार आहोत. लाभार्थींनी एकाच योजनेचा लाभ घ्यावा, अशी सरकारची भूमिका आहे. राज्यात श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा.