समाविष्ट ३४ गावातील गायरानासह सरकारी जमिनीवर अतिक्रमणांचा विळखा

Date:

गुन्हे दाखल करुन जमीनी मुक्त कराव्यात अन्यथा आम आदमी पक्षाचे तीव्र आंदोलन

पुणे:
महानगरपालिकेतील नव्याने समाविष्ट ३४ गावातील गायरान तसेच सरकारी मालकीच्या जमिनींवरील बेकायदा अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. त्यामुळे प्रचंड लोकसंख्येच्या या गावात सार्वजनिक विकास कामांसाठी जागाच शिल्लक राहिल्या नाहीत. बेकायदा अतिक्रमणे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन सर्व जमीनी मुक्त कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर व नागरिकांनी दिला आहे.
याबाबत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.३४ गावांमधील गायरान व सरकारी जमिनींवरील स्थानिक नजीकचे जमिनधारक तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी दमदाटी व दादागिरी करून बेकायदा अतिक्रमण केली आहेत. उर्वरित जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत.
धायरी, नऱ्हे, आंबेगाव , फुरसुंगी , किरकटवाडी , खडकवासला , नांदोशी आदी गावांतील गावांमध्ये गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे झाली आहेत.
गायरान व सरकारी जमिनी बळकावून तेथे टपऱ्या,दुकाने ,दारू धंधे, गायी म्हशींचे गोठे, बोगस संस्था, मंदिर, हॉल उभारले जात आहेत.ठिक ठिकाणी मंदिरे,हाॅल भाड्याने दिल्या जात आहेत.झाडांची बेसुमार कत्तल करून पर्यावरणाची हानी सुरू आहे.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,
बेकायदेशीर अतिक्रमण कायदेशीर करण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून त्यांची सरकारी दप्तरी नोंद केली जात आहे. याठिकाणी बेकायदेशीर विद्युत कनेक्शन घेतले आहे .
त्याकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केले आहे. तातडीने अतिक्रमणांवरील सर्व बांधकामाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात यावा.तसेच सरकारी मालकीच्या जमिनीची मोजणी करून सर्व जमीनी मुक्त कराव्यात.

सरकारी क्षेत्रावर चुकीचा ताबा दाखविण्यात येत आहे त्यामुळे भविष्यात सदर सरकारी जागांचा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाला मोठ्या अडचणी येणार आहेत.त्यामुळे सर्व गायरान व सरकारी जमिनींची हद्द निश्चित करुन कंपाऊंड टाकण्यात यावे व त्यांचे संरक्षण करण्यात यावे.

बेकायदा अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत.बेकायदा अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी धडक मोहीम सुरू करावी.गायरान व सरकारी जमिनींचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना मोठ्या पैसे दिले जात आहेत.त्यांची सी.बी.आय व उच्चस्तरीय चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

आगामी काळात अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात. त्यामुळे कोट्यवधी रुपये किंमतीच्या जागा भविष्यात सार्वजनिक विकास कामांसाठी वापरता येणार आहेत.याची गांभीर्याने दखल तातडीने कार्यवाही सुरू करावी अन्यथा तीव्र जन आंदोलन करण्यात येणार आहे असे धनंजय बेनकर यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...