दीडशे मतदारसंघात जवळपास 20 ते 25 हजार मतदार वाढवले:प्रत्येक बूथ वर शंभर ते दीडशे मत वाढवले, संजय राऊतांचा दावा

Date:

संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान कसे?

मुंबई-मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचा डेटा सादर न केल्याने ही नोटीस देण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेवटच्या तासात वाढलेले मतदान हा घोटाळा असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.संजय राऊत म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान कसे? निवडणूक आयोग म्हणते हे शक्य आहे, अरे कसे शक्य आहे? 76 लाख? आणि आपण जर मागणी केली साधारण दीडशे मतदारसंघात तर जवळपास 20 ते 25 हजार मतदार वाढवले आहेत. आणि प्रत्येक बूथ वर शंभर ते दीडशे मत वाढवले आहेत. हा जो घोळ आहे त्यातूनच महाराष्ट्रमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सरकार स्थापन झाले. हे सरळ मार्गाने सरकार आलेले नाही आणि हायकोर्टाने विचारले की हे बरोबर आहे का पण जनता सुद्धा तेच विचारत आहे. हायकोर्टाने विचारलेल्या प्रश्नाच्या मुळापर्यंत गेले तरच या देशातील लोकशाहीला एक भक्कम आधार मिळेल.

संजय राऊत म्हणाले, कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालं तर या देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास जो घसरत चाललेला आहे तो पुन्हा एकदा विश्वास बनेल. मरकडवाडी तर देशाच्या नकाशावर गेली. मरकडवाडी माळशिरस मतदारसंघातील उत्तमराव जानकर यांचा मतदारसंघ येथील गाव आहे. या गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे मॉक पोल घेण्याची तयारी दाखवली मराठी पेपर वर आणि अख्या देशांमध्ये त्याची चर्चा झाली युनो मध्ये चर्चा झाली की भारतातल्या लोकशाहीला कसे ग्रहण लागले आहे आणि जे मतदान झाले आहे त्यावर लोकांचा कसा विश्वास नाही यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली. पण निवडणूक आयोगाने मरकडवाडीत 144 कलम लावले कारण ते घाबरले. हीच मग लागण अख्या देशांमध्ये लागेल अशी भीती त्यांना वाटली आणि यांचं बिंग फुटेल हे त्यांना लक्षात आलं, अशी टीका संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर केली आहे.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर देखील टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, तो त्यांचा पक्षच नाही. तो अमित शहा यांचा पक्ष आहे. त्यातील 20 ते 25 आमदार तर थेट भाजप पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे मला या दोन्ही गटाचे काही खरे वाटत नाही. अजित पवार गटाचे आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते भाजपमध्ये विलीन होतील. तसेच आनंदराव आडसुळ यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आले तर आनंदच होईल, असे म्हंटले आहे, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, त्यांच्या नावातच आनंद आहे. खरी शिवसेना आमची आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना खरी आहे आणि आमची शिवसेना आमच्या जागेवर आहे. आमची सुद्धा तेव्हा इच्छा होती की पक्ष तुटू नये.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...