‘हे तो प्रचितीचे जगणे’ पुस्तकाचे प्रकाशन

Date:

पुणे :

​’आजही देशातील सामान्य लोकांपर्यंत आपण खरे ज्ञान पोहचवू शकलो नाही, याची मनोमन खंत वाटते, या सामान्य लोकांपर्यंत खरे ज्ञान पोचवण्याचे आणि देशातील ही ज्ञानातील विषमता दूर करण्याचे आव्हान हे ‘प्रचिती’च्या आणि एकूणच देशातील सामाजिक कार्यकर्त्यापुढे आहे,’ असे स्पष्ट मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

१९९० च्या दशकातील ‘प्रचिती’ या महाविद्यालयीन संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अनुभव आणि वाटचाल यांवर आधारित लेखांचे संकलन असलेल्या ‘हे तो प्रचितीचे जगणे’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते आणि स्नेहालय (अहिल्यानगर) संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या विशेष उपस्थितीत प्रबोध सभागृह, ज्ञान प्रबोधिनी (सदाशिव पेठ), पुणे येथे झाले. या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रचिती कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजनही करण्यात आले होते. दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमात डॉ . माधव गाडगीळ यांनी सामाजिक कार्यकर्त्यांपुढील आव्हानांचा वेध घेतला. श्री. गाडगीळ म्हणाले, “येत्या तीन वर्षात आधुनिक तंत्रज्ञानामुळे भाषेत क्रांती घडून येईल आणि जगातील सर्व भाषेतील ज्ञान सर्वांना अगदी सहज उपलब्ध होईल. त्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्ञानाची गंगा नेणे हे गुरूजनांना शक्य होईल. गुगलमधील काही ऍपमुळे जसे की इमेज ऍपमुळे आदिवासी तरुण वनरक्षकांनाही दुर्मिळ वनस्पतींची शास्त्रोक्त नावे मोबाईलद्वारे फोटो काढून लगेच बघता येतात. नवं तंत्रज्ञान अशाप्रकारे सर्वांनाच ज्ञानार्जन करण्याला उपयुक्त ठरत आहे, ही चांगलीच गोष्ट आहे.”

“हे तो प्रचितीचे जगणे…” या पुस्तकातील लेखकांचं जगणं, जीवनानुभव आणि जीवन चळवळीविषयी वाचकांना जाणून घेता येईलच पण त्याचबरोबर संस्थात्मक कार्य मोठ्या प्रमाणावर कसे उभे करावे, याचा हे पुस्तक रोल मॉडेल ठरेल. या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्ताने मी सर्व लेख वाचले आणि वाचल्यावर असे वाटले की या पुस्तकाच्या वाचनाने वाचकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. माझ्या आयुष्यात अशी ‘प्रचिती’ आली असती तर माझ्यासमोरच्या प्रश्नांकडे मीही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकलो असतो,” अशी प्रांजळ कबुलीही प्रमुख पाहुणे डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिली. “समाजकार्य करताना ‘मी नाहीतर कोण आणि आता नाही तर केव्हा?’ ह्या प्रश्नाचा सतत पाठपुरावा करत राहणं कसं आवश्यक आहे, यावरही गिरिश कुलकर्णी यानी प्रकाश टाकला.

“आपल्यातलेच/आपल्यासारखेच हे युवक-युवती आहेत, त्यामुळे करिअरच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अनेकांना यातून प्रेरणा मिळेल,” असा विश्वास पुस्तकाच्या प्रयोजनाविषयी बोलताना अजित कानिटकर यांनी व्यक्त केला. विवेक कुलकर्णी यांनी “प्रचिती विचार चिंतन” या विषयीची सविस्तर भूमिका मांडली.

‘जनरेशन एक्स, वाय, झेड किंवा अगदी अलीकडच्या अल्फा, बिटा यांचं पालकत्व स्वीकारून त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी त्यांचे अधिमित्र (Mentor) म्हणून काम करण्याची आजच्या काळाची गरज त्यांनी अधोरेखित केली.

कार्यक्रमाची सुरुवात करून देताना राजेंद्र आवटे यांनी पुस्तकामागचा थोडा इतिहास सांगून सर्वच प्रचिती सदस्यांच्या मनात असणारी विवेक कुलकर्णी यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त केली आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. वैशाली कणसकर यांनी पुस्तक संपादन निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती दिली. गीतांजली देगावकर, संग्राम गायकवाड, नीलम ओसवाल आणि मुकेश कणसकर यांनी लेखनामागच्या भावना व्यक्त केल्या.

‘देशप्रश्न घालती युवा मना साद, समजसेवेचा लगे खुळा नाद| नवी पिढी घडो हेच आहे मागणे || हे तो प्रचितीचे जगणे…’ अशा शब्दांत सुभाष देशपांडे यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना सगळ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी धर्माधिकारी यांनी केले तर मिलिंद संत आणि प्रचिती सदस्यांनी ‘आज प्रचिती द्या’ हे पद्य सादर केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...