भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पाण्यासाठी बोंबाबोंब -महापालिकेवर हंडा मोर्चा

Date:

पुणे- भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर येऊ लागली असून क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नागरिकांची मागील १५ दिवसांपासून पाण्यासाठी वणवण चालू आहे, यासाठी जबाबदार असणारे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्या टोलवा टोलवीमुळे आज जनता बेहाल झाली आहे. भवानी पेठ, गुरूवार पेठ, नाना पेठ व इतर अनेक भागातील नागरिकांना जबाबदार अधिकारी वर्गाकडूनही योग्य सहकार्य मिळत नाही. सदर विषयात ठेकेदार हात वर करून प्रशासनाला जबाबदार असल्याचे सांगत आहे. ह्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.यामुळे आज शिवसेनेने महापालिकेवर हंडा मोर्चा नेला .

आज केलेल्या आक्रमक धडक मोर्चा आंदोलनामधे महापालिका अधिकाऱ्यांसमोर हवेत हंडे भिरकवण्यात आले. महिला पाण्यासाठी इतक्या आक्रमक होत्या कि पालिका अधिकारी आपल्या जागा सोडून पळून गेले. पोलीस महापालिका अधिकाऱ्यांना घेउन आले त्यांनी निवेदन स्वीकारून मिडीया समोर कबुली दिली आणि साध्या कागदावर लेखी आश्वासन दिले कि उद्या पाणी पुरवठा सुरळीत केले जाईल. तत्पूर्वी सकाळी क्षेत्रिय कार्यालयावर शिवसेनेचा हंडा मोर्चा धडकणार समजल्यानंतर त्वरीत मनपा अधिकारी शिवसेना पदाधिकाऱ्यांना भेटून आश्वासन देत होते. मोर्चा काढू नका आजच्या आज पाणी चालू करतो असे सांगितले . पण शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी ,’ 15 दिवसापासून तुम्हाला निवेदन देत आहोत तर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची 100 नं वर फोन करून तक्रार दाखल करता. मग आम्ही तुझे का ऐकावे ? मोर्चा निघणारच आणि जाब विचारणारच अशी भूमिका स्पष्ट केली होती

मोर्चा च्या प्रसंगी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, जावेद खान, युवती जिल्हा समन्वयक निकीता मारटकर, आंगणवाडी प्रमुख गौरी चव्हाण अधिकारी सनी गवते, महिला उपशहर संघटिका पद्मा सोरटे, रोहिणी कोल्हाळ, स्वाती कथलकर, ज्योती चांदेरे, सुलभा तळेकर, मेघा पवार, सुनिता खंडाळकर, अमृत पठारे, करूणा घाडगे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनाच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाने तात्पूर्ते मलमपट्टीचे काम केले असून अजूनही पाणी गळती सुरूच आहे, त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, सदर गळतीमध्ये सांडपाणी मिक्स होत असल्याचे, तसेच नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांच्या तक्रारी आहेत तर प्रशासन आणि ठेकेदार बिले काढण्यात मशगुल आहेत. आज १५ दिवस उलटूनही ह्या वादामुळे पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे शिवसेना पुणे शहराच्या वतीने आपल्याला मोर्चाद्वारे निवेदन देत सुरळीत पाणी पुरवठ्याची माागणी करण्यात आल्याचे मोरे यांनी म्हटले आहे.. जे नागरिकांच्या हक्काचे पाणी आहे ते त्यांना मिळणे कायद्यानुसार गरजेचे आहे. नागरिकांकडून मिळकत कर वेळेवर भरून घेतला जातो तर त्यांना पुणे महानगरपालिकेडून सर्व सुविधा वेळेवर देणे बंधनकारक आहे.या सदर विषयात तत्पर कारवाई होऊन पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेना जनतेच्या हितासाठी प्रशासनास नक्की पाणी पाजेल हे लक्षात असावे.असाही इशारा मोरे यांनी दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...