देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Date:

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित आठव्या युवा संसदेचे उद्घाटन

पुणे: केवळ राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी देशाचे संविधान बदलण्यात येणार असल्याचा गैरसमज समाजामध्ये पसरविला. त्याचा काहीसा राजकीय लाभ त्यांना मिळाला आहे, परंतु देशातील लोक अशा अफवांना बळी पडणार नाहीत. देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही त्यामध्ये केवळ दुरुस्ती करता येते, अशा प्रकारे संविधानामध्ये अनेकदा दुरुस्ती करण्यात आली आहे, असे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजित आठव्या युवा संसदेचे उद्घाटन नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते. संस्थेच्या ‘उडान’ या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी खासदार अरविंद सावंत यांना आदर्श खासदार पुरस्कार, सुधीर मुनगंटीवार, सत्यजित देशमुख आणि अमित गोरखे यांना आदर्श आमदार पुरस्कार, विठ्ठल काटे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, सचिन शेलार यांना आदर्श सरपंच पुरस्कार, ॲड. मंगेश ससाणे यांना आदर्श युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केवळ चांगले शिक्षण देत नाही तर एक समृद्ध पिढी घडवत आहे. या संस्थेने कायमच नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तरुण निर्माण केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकार जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार करत आहे आणि त्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राजकारणाबद्दल तळागाळामध्ये द्वेष आणि चीड निर्माण झाली आहे. परंतु अशा प्रकारे राजकारणाबद्दल द्वेष का निर्माण झाला आहे याचाही विचार करणे गरजेचे आहे. अनेकजण आज केवळ पैसा मिळवण्यासाठी राजकारणामध्ये येतात हा विचार सर्वसामान्यांमध्ये रुजला आहे, परंतु राजकारण हे समाजकारण करण्याचे एक साधन आहे. ही भावना आजच्या तरुणांमध्ये रुजवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समृद्ध भारत घडू शकेल. राजकारणामध्ये तरुणांनी जाऊ नये हा भ्रम दूर केला पाहिजे, तसेच राजकारण म्हणजे केवळ निवडणूक हा गैरसमजही दूर झाला पाहिजे. निवडणूक हे राजकारणामध्ये येण्याचे केवळ एक माध्यम आहे परंतु निवडणूक म्हणजे राजकारण नाही.

भागवत कराड म्हणाले, युवा संसदेच्या माध्यमातून निर्माण झालेले तरुण हे उद्याचा बलशाली भारत घडविणार आहेत. सशक्त भारत घडविण्यासाठी संस्कारक्षम तरुण पिढीची गरज आहे. आज संस्कारक्षम तरुण घडविण्याचे काम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट शिक्षण आणि युवा संसदेच्या माध्यमातून करत आहे. युवकांनी राजकारणामध्ये निश्चितच आले पाहिजे, परंतु राजकारणामध्ये येताना आपण कशासाठी राजकारणामध्ये येणार आहोत हे स्पष्ट पाहिजे. अन्यथा केवळ पैसा आणि सत्तेसाठी राजकारणामध्ये आलात तर त्या ठिकाणी फार काळ टिकू शकत नाही.

अरविंद सावंत म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जात, धर्म, पंथ विसरून समाजासाठी एकत्र यावा, असे आवाहन केले होते. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जात आणि धर्मावरून वाद निर्माण होत आहेत. ही भांडणे लावणारे लोक मात्र सत्तेचा आनंद घेत आहे हे सर्व सामान्य लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. आजचे राजकारण हे सुसंस्कृत राजकारण राहिलेले नाही या राजकारणामधून समाजकारण कधीच दूर गेले आहे. केवळ सत्ता आणि पैसा याचे समीकरण जुळवण्यासाठी आज लोक राजकारणामध्ये येत आहे अशा प्रसंगी सर्वसामान्य माणूस कसा राजकारणामध्ये येऊ शकतो आणि समाजासाठी काम करू शकतो असा प्रश्न निर्माण झाला आहे, परंतु तरीही एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने युवा संसदेच्या माध्यमातून तरुण घडविण्याचे काम केले आहे हे निश्चितच वाखाणण्यासारखे आहे.

सत्यजित देशमुख म्हणाले, राजकारणाविषयी चेतना जागवण्याचे काम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट करत आहे यामधून निश्चितच उद्याचे उज्वल भवितव्य घडणार आहे. मी माझ्या सांगली कार्यक्षेत्रामध्ये ताडोबा अभयारण्याच्या धर्तीवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प उभा केला हा प्रकल्प उभा करण्यासाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मला खूप कार्य लागले हा व्याघ्र प्रकल्प जागतिक वारसा लाभलेला व्याघ्र प्रकल्प आहे.

अमित गोरखे म्हणाले सामाजिक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी सातत्य महत्वाचे असते. हेच सातत्य जाधवर ग्रुप इन्स्टिट्यूट ने शैक्षणिक क्षेत्रामध्ये दाखवले आहे. त्यामुळेच जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट निश्चितच काही दिवसात जाधवर अभिमत विद्यापीठ मध्ये रुपांतरीत होऊ शकेल. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा केवळ शैक्षणिक क्षेत्रामध्येच नव्हे तर समाज उभारणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे.

विठ्ठल काटे म्हणाले, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे एका आदर्श शिक्षण संस्थेचे उदाहरण आहे. या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देऊन नोकरीसाठी तयार केले जात नाही तर उद्याचे उज्वल भविष्य निर्माण करणारे तरुण या इन्स्टिट्यूट मध्ये घडविले जातात या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे कर्तृत्ववान राजकारणी निर्माण होणार आहेत. या राजकारण्यांनी अशा प्रकारच्या युवा संसदेच्या माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्यात निश्चितच सकारात्मक दृष्टिकोन जागृत असेल आणि त्याचा निश्चितच समाजाला आणि देशाला फायदा होईल.

ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, आज संस्थेमध्ये भरलेला विद्यार्थ्यांचा मेळावा महत्त्वाचा आहे. कारण हेच विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. राजकारणा संदर्भात तरुण सुशिक्षित व्हावा त्यांच्या मध्ये राजकारणाविषयी जागृती निर्माण व्हावी, हा या युवा संसद आयोजित करण्याचा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश निश्चितच सफल होत आहे. या युवा संसदेतील प्रेरणा घेऊन उद्याचे चांगले नेतृत्व निर्माण झाले, तर त्यातूनच सशक्त भारत निर्माण होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...