पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सूत्रांचा दाखला देत बातमी देणाऱ्या माध्यमांवर चांगलेच भडकले. या सूत्रांना जीवनगौरव दिला पाहिजे. मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणतेही विधान केले नाही. त्यानंतरही तशी बातमी चालवण्यात आली. हा माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणालेत.गुइलेन बॅरे सिंड्रोमवरील उपचार महाग असल्याची तक्रार येते आहे. याबाबत आता उपचाराचा खर्च किती आहे? हे आता डोक्त्रांनाच विचारतो असेही ते म्हणाले राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उल्लेख मी केव्हाच केला नाही, असे विधान अजित पवारांनी केल्याचा दावा नुकताच काही माध्यमांनी केला होता. त्यामुळे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी उपरोक्त विधान केले आहे. अजित पवार शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, प्रसारमाध्यमांनी अजित पवारांचा कर्जमाफीला विरोध अशा आशयाची बातमी चालवली. त्यांनी आपण काय बातमी देत आहोत याचा थोडासा विचार करावा. मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असे केव्हाच म्हणालो नाही. मी स्वतः शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण धादांत खोट्या बातम्या देऊन माझी बातमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बातमी सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली. या प्रकरणी काही बोलायचे असेल तर मी स्वतः बोलेन. तरीही प्रसारमाध्यमांकडून सूत्रांच्या हवाल्याने का बातम्या दिल्या जातात? या सूत्रांना जीवनगौरव पुरस्कार दिला पाहिजे. अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या संसर्गावरही भाष्य केले. ते म्हणाले, राज्य सरकार व आरोग्य विभाग या प्रकरणी बारीक लक्ष ठेवून आहे. या आजाराच्या उपचारासाठी जास्त खर्च येत आहे. आर्थिक बाबी सांभाळायचे काम सरकारकडे आहे. मी सोमवारी यासंबंधी मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहे. अजित पवारांनी यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठात 60 कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात आल्याचेही सांगितले. सामाजिक न्याय आयुक्तालय, दिव्यांग कार्यालयाच्या कामासाठी 225 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुण्यात लवकरच टाऊन प्लॅनिंग कार्यालय उभारण्यात येणार आहे. साखर संकुलाचे सहकार भवनात रुपांतर केले जाईल. राज्यातील अनेक कार्यालये पुण्यात होत आहेत, असे ते म्हणालेत. दुसरीकडे, भाजप नेते अशोक चव्हाण यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर महायुतीमधील घटकपक्षांत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, सध्या कर्जमाफीच्या मुद्यावरून महायुतीत मतभेद असल्याची चर्चा आहे. पण सरकारमध्ये असे कोणतेही मतभेद नाहीत. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतली. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांच्या काही कल्पना असतील. त्याची मला माहिती नाही. राज्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी चर्चा होऊन कर्जमाफीसंबंधी निर्णय घेतला जाईल. यात मतभेदाचा विषयच येत नाही.
‘त्या ‘ सूत्रांचा तर पुरेपूर बंदोबस्त करतो,GBS वरील उपचाराचा खर्च आता डॉक्टरांना विचारतो – अजितदादा
Date:

