राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र होतो, अमृता फडणवीसांचे सूचक विधान

Date:

मुंबई-अलिकडच्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भाजपसोबत जवळीक वाढली आहे. यावरून मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी भाष्य केले. नेत्यांमध्ये विचाराधारांबाबत मतभेद आहेत. त्यामुळे एकेकाळचा शत्रू हा मित्र होतो, मग परत शत्रू होते, अशी कितीतरी उदाहरणे असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. यावेळी त्यांनी शरद पवारांनी संघाच्या कामाबद्दल केलेल्या कौतुकावर प्रतिक्रिया दिली.

राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि ठाकरे गटाची जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आदित्य ठाकरे हे देखील आतापर्यंत तीन वेळा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. शिवाय ठाकरे गटाच्या ‘सामना’मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीसांनी सूचक विधान केले.

उद्धव ठाकरे यांची भूमिका बदलत आहे का? असा सवाल अमृता फडणवीस यांना विचारला असता, नेत्यांमध्ये असणारे मतभेद हे विचारधारांबाबत आहेत. त्यांच्या वैयक्तिक पातळीवर ते मतभेद नाहीत. वैचारिक मतभेद असल्याने राजकारणात एकेकाळचा शत्रू असणारा हा मित्र होतो, मग परत शत्रू होतो, परत मित्र होतो अशी कितीतरी उदाहरणे आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळे प्रगतीचे राजकारण करतात, असे मला वाटते. जातीय राजकारण आपण आणतो, आपण ते करायला नको. लोकांच्या हातात ही बाब आहे, माध्यमांच्या हातात आहे.अमृता फडणवीस यांनी शरद पवार यांनी संघाच्या कामाच्या केलेल्या कौतुकावरही आपले मत मांडले. शरद पवार हे दिग्गज नेते आहेत. त्यांचे विश्लेषण खूप चांगले असते. आरएसएस बाबत ते जे बोलले ते चांगलेच विश्लेषण त्यांनी केले. त्याबद्दल मला त्याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

⁠खासदार क्रीडा महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने समारोप पुणे (प्रतिनिधी) :...

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर मुंबई | दि. २५...