संजय राऊत हे रिकामटेकडे, ते रोजच काहीतरी मत व्यक्त करतात

Date:

मुंबई-संजय राऊत हे रिकामटेकडे आहेत. ते रोजच काहीतरी मत व्यक्त करतात. मात्र त्यांच्या मतावर मी व्यक्त व्हायलाच पाहिजे असे नाही. मला कामे असतात. मी रिकामटेकडा नाही. अशा कडक शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या स्वबळाच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूर येथे बोलत होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वभावावर लढवणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्वच महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दात उत्तर दिले आहे. त्यांच्या या घोषणेवर काहीही बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवलेल्या निवडणुकीत लोकसभेत या तीनही पक्षांना चांगले यश मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. या परभावानंतर महाविकास आघाडी टीकते का? असे प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच आता संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राऊत यांची ही घोषणा म्हणजे महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार नसल्याचे संकेत मानले जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...