अखेरीस बंड शमलं… दाभेकरांची उमेदवारी मागे ….
पुणे- सत्ता आणि निव्वळ सत्ता हे समीकरण न ठेवता ४०/४० वर्षे पक्षात राहून कसलीही अपेक्षा न बाळगता काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेला पक्षात काही किंमत आहे कि नाही ? असा सवाल कॉंग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी काल उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मनधरणीसाठी आलेल्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केला आणि साऱ्यांना अवाक केले ,, आणि आज मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज घेऊन अनेकांना धक्का दिला.
महाविकास आघाडीतर्फे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक रवींद्र धगेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता .दाभेकर यांच्यामुळे महाविकास आघाडीतील काही मते त्यांना जाऊन अधिकृत उमेदवारास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे दाभेकर यांना महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा द्यावा आणि आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे. मात्र, बाळासाहेब दाभेकर यांनी आपण सक्षम उमेदवार असताना आपणास नेत्यांनी जाणीवपूर्वक डावलण्यात आले त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण अपक्ष निवडणूक लढत असल्याचे संबंधित शिष्टमंडळास सांगितले होते.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या आदेशानुसार पुणे शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांच्या मनधरणीसाठी त्यांच्या कार्यालयात भेट देऊन काल बुधवारी सविस्तर चर्चा केली. निरीक्षक आमदार संग्राम थोपटे, पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती धनंजय वाडकर,प्रदेश कमिटी प्रतींनिधी अभय छाजेड,प्रदेश कमिटी प्रतिनिधी कमल व्यवहारे,माजी नगरसेवक अजित दरेकर,माजी नगरसेवक रफिक शेख,,मेहबूब नादफ यांनी बाळासाहेब दाभेकर यांची भेट घेतली.महाविकास आघाडीचे मित्र पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे,माजी उपमहापौर दीपक मानकर,माजी स्थायी समितीअध्यक्ष बाळासाहेब बोडके,शिवसेनेचे विशाल धनवडे,तसेच बाळासाहेब दाभेकर यांचे निकटवर्तीय राजाभाऊ पंडित,महेश वाघ प्रमोद घाडगे,अनिल पायगुडे,संजय उभे विशाल गुंड नितिन परदेशी,निरंजन दाभेकर कालच्या चर्चेच्या वेळी उपस्थित होते.
आज उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर दाभेकर यांनी पत्रकार परिषद बोलाविली आहे, पण आता माघार घेतल्यावर काय बोलणार ? असा प्रश्न उपस्थित होत होता .

