Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नळाला मीटर बसविण्याची घाई कशासाठी ? नितीन कदमांचा आयुक्तांना थेट सवाल

Date:

म्हणाले, जनतेच्या पैशावर सण करणे थांबवा….

पुणे- २४ तास समान पाणीपुरवठ्याच्या नावाखाली गेली सुमारे ६ वर्षापासून महापालिका प्रशासन नागरिकांकडून वाढीव पाणीपट्टी वसूल करत असताना आता प्रशासकांनी त्यावर कडी केली आहे , पाण्याच्या नळाला मीटर बसविण्याची कार्यवाही अत्यंत घाईने सुरु केली आहे . २४ तास समान पाणीपुरवठा योजनेचे काम कधी पूर्ण होणार याबाबत कोणतेही उत्तर नसताना मीटर बसवून कोणाचे उखळ पांढरे करण्यात येत आहे असा आरोप करत हि घाई कशासाठी असा सवाल महापालिका आयुक्तांना राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहराध्यक्ष नितीन कदम यांनी केला आहे.

राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहराध्यक्ष नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली सेल पदाधिकार्‍यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट मागणीचे निवेदन दिले. यावेळी सेलचे स्वप्निल दुधाने, गणेश नलावडे, स्वप्निल खडके, मदन वाणी, प्रशांत गांधी, प्रमोद इंदापूरकर, सुमित मोरे, राजाभाऊ घोलप, मच्छिंद्र उतेकर, प्रमोद शिंदे, चंदन जगताप आदी उपस्थित होते.

याप्रकरणी कदम यांनी सांगितले कि,’ राष्ट्रवादी अर्बन सेलची मागणी समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्या, पाईप लाईन हे पायाभुत कामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. असे असताना कर्ज काढून पाणी मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मीटरप्रमाणे पाणीपट्टी आकारली जाणार आहे. काम पूर्ण होण्यास नेमका किती वेळ लागणार आहे, हे सांगता येत नाही. मग कर्ज काढून खरेदी केलेल्या मीटरच्या व्याजासाठी पुणेकरांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी नेकमी कोणाचे मीटर चालवण्यासाठी केले जात आहे, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी अर्बन सेलने ऋण काढून सण करणे थांबवा अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पुणे शहरामध्ये समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याचे मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र हे मीटर बसविल्यानंतर लगेच शहरातील नागरिकांना अतिरिक्त पाणीवापर करत असल्याबाबत चुकीच्या पद्धतीने नोटिस देण्यात आल्या. या योजनेंतर्गत घरोघरी पाणी मीटर बसवण्याच्या अगोदर महापालिकेच्या विविध इमारती आणि कार्यालयांमध्ये पाणी मीटर बसविणे गरजेचे आहे.शहराला 11.50 टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. मात्र कालानुरूप शहराची हद्द व लोकसंख्या मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. शहराच्या वाढीव हद्दीचा आणि लोकसंख्येचा विचार करता पाण्याचा वाढीव कोटा मंजूर करून घेणे गरजेचे आहे.

विविध जलशुध्दीकरण केंद्रांना पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनी व विविध परिसराना पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिन्या जुन्या व जीर्ण खराब झाल्या आहेत. नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. काही परिसरांत जलवाहिन्या टाकून एक ते दोन वर्षे झाली आहेत, मात्र अद्याप त्यांची तपासणी (टेस्टिंग) झालेली नाही.
योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची कामे सुरू आहेत. कामे पूर्ण झालेल्या टाक्या विनावापर स्थितीत आहेत. त्यामुळे त्या खराब होण्याच्या मार्गावर आहेत. तरी या टाक्या त्वरित नागरिकांच्या सेवार्थ सुरू कराव्यात. योजनेतील कामे अपूर्ण स्थितीमध्ये असूनही मीटर बसविण्याची घाई महापालिकेकडून का केली जात आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर कर्जाच्या पैशाचा वापर पाणी मीटर खरेदीसाठी करावा. त्यामुळे पुणेकरांना व्याजाची वाचेल.
दरम्यान, योजनेंतर्गत बसविण्यात येणारे मीटर व त्याचे मटेरियल यांच्या दर्जाबाबतही नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. तसेच मीटर बसविणारे कर्मचारीदेखील प्रशिक्षित नसल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईनमधून पाणी गळतीचे प्रकार पहायला मिळत आहेत. तरी हे मीटर बसविणार्‍या व मुख्य लाईनला पाईप जोडणार्‍या कर्मचारी यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत योग्य त्या तपासण्या कराव्या, अशा मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना करण्यात आल्या आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...