Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अण्णाभाऊंना भारतरत्नसाठी आग्रह धरू – अशोक चव्हाण

Date:

पुणे- अण्णा भाऊंना मरणोत्तर भारतरत्न मिळावे, या मागणीला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्राला पत्र द्यावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरू, असे आश्वासन राज्याचे माजी मुख्यमंत्री,आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. अखिल महाराष्ट्र मातंग समाजाच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही या वेबिनार मध्ये सहभागी होणार होते होते परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते सहभागी होऊ शकले नाही परंतु फोनवरून त्यांनी या वेबिनारला शुभेच्छा व्यक्त केल्या.

अशोक चव्हाण म्हणाले, पोटासाठी जगणाऱ्या माणसांच्या अस्तित्त्वाचा लढा अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यातून मांडला. गरीब-शोषितांचे जीवन त्यांनी साहित्यातून चितारले. मालकधार्जिण्या गोष्टींवर प्रहार केला. इंग्रजांची सत्ता असताना त्या विरोधात आवाज उठवण्याची धमक त्यांनी दाखवली. त्यांच्या लालबावटा कलापथकावर इंग्रज सरकारला बंदी घालावी लागली हे अण्णांच्या लढ्याचे यश होते. अण्णाभाऊ हे क्रांतीची चालतीबोलती मशाल होते.

त्यांच्या समाजाच्या सर्व मागण्यांना न्याय देण्यासाठी येत्या वर्षभरात सर्व तऱ्हेने प्रयत्न करण्याचे आश्वासनही चव्हाण यांनी दिले.राष्ट्रवादी च्या नेत्या खासदार सौ. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अण्णा भाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नव्हते तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे कर्तृत्ववान सुपुत्र होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची जन्मशताब्दी आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरी करता आली नाही.पुढील वर्षात त्यांच्या नावाने शैक्षणिक कार्य, संशोधकांसाठी पाठ्यवृत्ती अशा स्वरूपात भरीव काम करण्याचे आश्वासनही सौ. सुळे यांनी दिले.

मातंग स्पीकस या अभियानाच्या माध्यमातून राज्यातला सकल मातंग समाज एकत्रित येऊन आत्मीयतेने, तळमळीने काही मागण्या करीत आहे. अण्णा भाऊंना भारतरत्न मिळावे, बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने (आर्टी) संस्था व्हावी, लहुजी साळवे यांचे भव्य स्मारक व्हावे, अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे, समाजाच्या व्यक्तीला विधान परिषदेवर प्रतिनिधित्व मिळावे, अ, ब,क,ड, प्रमाणे मातंग समजला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे, लहुजी वस्ताद अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू करावे, अशा या मागण्या आहेत.
त्याबद्दल जन्मशताब्दी वर्षात सकारात्मक विचार करून त्यावर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे समन्वयक रवींद्र दळवी, आरपीआय मातंग आघाडीचे हनुमंत साठे, शिवसेनेचे बाळासाहेब भांडे, या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळेस राष्ट्रवादीचे विजय डाकले, साहित्यिक सुरेश पाटोळे, काशीनाथजी आल्हाट, अब्राहाम जी आवले, उपस्थित होते.

लहुजी समता परिषदेचे अनिल हातागळे यांही कार्यक्रमाचे आभार मानले तर कार्यक्रमाचे संयोजक मातंग एकता आंदोलन चे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष, नगरसेवक अविनाश बागवे यांनी सूत्रसंचालन केले.हे वेबिनार ऑनलाइन फेसबुक वर 48 विविध पेज व FB अकाउंट वरून share केल्यामुळे हेय वेबिनार एकाच वेळेस एकूण 3,10,000 नागरिकांच्या पर्यंत पोहचले असे आयोजकाने सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...