पूजा चव्हाण संशयित मृत्यूप्रकरणी सरकार जनतेला माहिती का देत नाही ?

Date:

विरोधी पक्षनेता प्रविण दरेकरांचा मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालकांना सवाल

मुंबई, दि.24 : पूजा चव्हाण संशयित मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री किंवा पोलीस महासंचालक जनतेला माहिती का देत नाहीत, असा जळजळीत सवाल आज प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आज पोलीस महासंचालक श्री.हेमंत नगराळे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली.
7 फेब्रुवारी, 2021 रोजी परळीतील युवती आणि सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिचा पुणे येथे संशयास्पद मृत्यू झाला. याच प्रकरणातील काही ऑडिओ सी.डी. व्हायरल झाल्या असून पूजा चव्हाण मृत्यूबाबत संशयाचे वातावरण निर्माण करणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली आहे. गेल्या 17 दिवसात संशय निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्यामुळे लोकांच्या मनात चौकशीबाबत संभ्रम निर्माण झाला असताना तपासाबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती जनतेला दिलेली नाही. यामुळे जनतेत विशेषतः महिलांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्या आणि जनतेच्या मनातील प्रश्न मांडण्यासाठी मी आज राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली व या प्रश्नांबाबत जनतेला अवगत करावे, अशी त्यांच्याकडे मागणी केल्याची माहिती प्रविण दरेकरांनी पोलीस महासंचालकांना भेटून आल्यानंतर प्रसार माध्यमांना दिली.
पूजा चव्हाण संशयित मृत्यूप्रकरणी दरेकरांनी पोलीस महासंचालकांना दिलेल्या पत्रात 14 महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवत असल्याने भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांना वारंवार व्हिडीओ आणि फोनद्वारे धमक्या येत असल्याची बाबही पोलीस महासंचालकांच्या कानावर घातली असून याप्रकरणी देखील तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्याकडे केल्याची माहितीही दरेकरांनी दिली.
या भेटीत दरेकरांबरोबर भाजपा नेत्या चित्रा वाघ देखील होत्या.

दरेकरांनी उपस्थित केले हे प्रश्न

  1. 7 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत 17 दिवस प्रमुख साक्षीदार, या घटनेतील महत्वाचा दुवा अरुण राठोड बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करीत आहेत ?
  2. अरुण राठोडला बेपत्ता कोण करू शकतो, याबाबत काही व्यक्ती संशयाच्या फेऱ्यात असताना पोलिसांनी आतापर्यंत त्यांची चौकशी का केली नाही ?
  3. अरुण राठोडचे नातेवाईक सुद्धा त्यांच्या गावातून बेपत्ता आहेत, अरुण राठोड व त्याच्या कुटुंबाचे काही बरेवाईट झाले किंवा कसे, अशी भीती जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. 17 दिवसात त्यांचाही शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. याबाबत पोलीस नेमकी काय कार्यवाही करीत आहेत ?
  4. अरुण राठोडच्या मूळ गावी असलेल्या घरात चोरी झाली असून याची चौकशी पोलिसांनी केली आहे का ?
  5. घटना घडून आणि ऑडिओ क्लिप उघड होऊन 17 दिवस झाले. पोलिसांनी कुणाची चौकशी केली, केली की नाही, प्रमुख संशयित, ज्यांचा आवाज या क्लिपमध्ये आहे, त्यांची चौकशी पोलिसांनी का केली नाही
  6. मृत पुजा चव्हाणचे कुटुंबीय प्रचंड दबावाखाली व असुरक्षित आहेत. “महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्यक्रम”, असा जयघोष करणारे सरकार त्यांना सुरक्षितता देणार का ?
  7. अरुण राठोड व एक महिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी दाखल झाले होते, त्या महिलेच्या नावाची नोंद पूजा चव्हाण या नावाशी मिळतीजुळती आहे. याचाही पोलीस तपासात फायदा होणार आहे. पोलिसांनी याबाबत चौकशी केली आहे का ?
  8. व्हिडीओ क्लिपमध्ये ज्यांचा आवाज आहे, ज्यांच्याबद्दल पूजाच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे, त्या मंत्रीमंडळातील संबंधित मंत्र्यांची चौकशी तातडीने करणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष पोलिसांकडून का केले गेले ?
  9. खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी करोनाच्या काळजीपोटी यात्रा, सभा, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे, जनसामान्य त्याचे पालन करीत आहेत, कोरोना विषयक खबरदारी पाळली नाही तर लॉकडाऊन करू अशी धमकी मुख्यमंत्री जनतेला देत आहेत, साधी मुखपट्टी नसेल तर 2000 रुपयांचा दंड सामान्यांकडून मुख्यमंत्री वसूल करतात. मग 17 दिवस लपून बसलेले मंत्रिमंडळातील एक मंत्री पोहरादेवी येथे शक्ती प्रदर्शन करतात, लाखोंचा जमाव जमवतात, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे का किंवा मुख्यमंत्री त्यांना कोणता दंड करणार आहेत
  10. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याच्या दबावामुळे पोलीस तपास प्रभावित झाला आहे का ?
  11. संशयित मंत्री यांच्यापर्यंत 17 दिवस झाले पोलीस पोहोचले नाहीत, पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याचा संशय जनतेच्या मनात आहे, याबाबत वस्तुस्थिती काय आहे ?
  12. मंत्रिमंडळातील मंत्री 15 दिवस गायब होतो, ते कुठे आहेत, का लपले आहेत, याची चौकशी मुख्यमंत्री म्हणून आपण केली का, असेल तर त्याची माहिती आपण जनतेला देणार का ?
  13. या प्रकरणात मुख्यमंत्री, गृह मंत्री आणि पोलीस महासंचालक माध्यमांना का टाळत आहेत, जनतेला माहिती का देत नाहीत ?
  14. विरोधी पक्ष नेता म्हणून मला, महाराष्ट्रातील जनतेला या प्रश्नांची उत्तरं हवीत, मुख्यमंत्री महोदय, गृह मंत्री महोदय किंवा पोलीस महासंचालक या प्रश्नांची उत्तरं देतील का ?
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...