‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचा रविवारी शुभारंभ

Date:


सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा-डॉ.राजेश देशमुख

पुणे दि.२२- प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक सर्व शेतकऱ्यांना देशातील बँकिंग व्यवस्थेअंतर्गत पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मोहिम स्तरावर प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, नाबार्डचे रोहन मोरे तसेच जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गतवर्षी विक्रमी पीक कर्ज वाटप केल्याबद्दल सर्व बँकांचे अभिनंदन करून डॉ.देशमुख म्हणाले,  यावर्षीदेखील ४ हजार कोटींच्या पीक कर्ज आराखड्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सुरूवातीपासून प्रयत्न करावे. २४ एप्रिल ते १ मे या कालावधीत प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक १ कोटी ३३ लाख शेतकऱ्यांचा किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत समावेश करण्यासाठी प्रत्येक बँक शाखेच्या पातळीवर प्रयत्न करावे. त्यासाठी  प्रत्येक शाखेसाठी समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि प्रत्येक दिवशी या मोहिमेचा आढावा घेण्यात यावा.

प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी विविध शासकीय विभागांची मदत घेण्यात यावी. २४ एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामसभेत अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करावा. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यासाठी बँक स्तरावर आढावा घेण्यात यावा.  सर्वांनी मिळून जिल्ह्याला या मोहिमेत प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.

शेतकरी व पशुपालन आणि मत्स्य व्यवसायातील व्यवसायिकांनी  गावातील राष्ट्रीयकृत किंवा अन्य व्यापारी बँकेशी संपर्क साधून किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा आणि ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहीम यशस्वी करून आपली स्वतःची आणि गावाची प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यां केले.

श्री.कारेगावकर म्हणाले, २४ एप्रिल रोजी प्रत्येक गावात ग्रामसभा घेण्यात येणार आहे. बँक प्रतिनिधींनी या ग्रामसभेत सहभागी होण्याचा प्रयत्न करावा आणि किसान क्रेडीट कार्डचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांची माहिती घ्यावी. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात यावी. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देत त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून ही मोहीम त्याचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय व कृषी मंत्रालयाच्या सूचनेनुसार ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ ही विशेष मोहीम राबविणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आजवर बँकांकडून पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड घेतलेले नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी शेतीसाठी खेळते भांडवल म्हणून या योजनेअंतर्गत पैसे घ्यावेत आणि त्याचा उपयोग करून आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवावे असा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही मोहीम प्राधान्याने राबविण्याच्या सूचना बैठकीत सर्व बँकांना देण्यात आल्या.

शेतीसोबतच पशूपालन किंवा मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या तिन्हीसाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था बँकांमार्फत करण्यात आलेली आहे. तसेच ज्या व्यक्ती केवळ पशुपालन किंवा मत्स्यपालन या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत अशा व्यक्तींनादेखील  किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत कर्जाची उपलब्धता करून देण्याची व्यवस्था बँकांमार्फत करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंगभूत वैशिष्ट्याद्वारे लाभार्थ्यांना व्याजाच्या सवलतीचा लाभ उपलब्ध करून देणे आणि खेळत्या भांडवलाच्या मदतीने आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

शेतकरी बांधवांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन ही योजना यशस्वी करावी असे आवाहन  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि  जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ईको कार – सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक:कारमधील 11 जण जागीच ठार

पुणे-कल्याण - अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी ईको कार व...

जिद्द,कष्टातून उभा राहिला स्वावलंबनाचा नवा आदर्श

यशकथा ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवायचे असेल,...

समाधान शिबाराचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते लोणीकंद येथे उद्घाटन

'विकसित भारत-२०४७' च्या संकल्पपुर्तीकरिता शासन प्रयत्नशील-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शासनाचे...