सांगली : मिरजहून लातूरला दिनांक 11 एप्रिल 2016 पासून रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या एक महिन्यापासून ट्रेनद्वारे पाणी देण्यासाठी काम करणाऱ्या सर्वच यंत्रणांच्या परिश्रमामुळे आजपर्यंत लातूरकरांना 6 कोटी, 20 लाख लिटर्स पाणी मिळाले आहे.
लातूरला 50 व्हॅगन्सच्या 23 व्या ट्रेनद्वारे आज दिनांक 11 मे 2016 रोजी सायंकाळी 4.15 वाजता 25 लाख लिटर्स पाणी पाठविण्यात आले. आज पाठविण्यात आलेल्या 25 लाख लिटर्स पाण्यामुळे आजपर्यंत (दि. 11 एप्रिल ते 11 मे) लातूरकरांना 6 कोटी, 20 लाख लिटर्स पाणी मिळाले आहे.
तत्पूर्वी रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने 10 व्हॅगन्सच्या प्रत्येकी 5 लाख लिटर्स अशा 9 रेल्वेद्वारे 45 लाख लिटर्स पाणी पोहोचविण्यात आले आहे. सांगली-मिरजकरांच्या या माणुसकीमुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला असून, लातूरकरांकडून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

