Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

औरंगाबादजवळ रेल्वे अपघातात १४ ठार, सर्वजण पायी गावाकडे जाणारे मजूर

Date:

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हतबल होऊन घरी निघालेल्या मजुरांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. औरंगाबाद-जालना दरम्यान करमाड येथे लोहमार्गवर झोपलेले मध्यप्रदेशातील 16 मजूर मालगाडीखाली सापडून जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाले. चार मजूर बाजूला झोपले असल्याने सुदैवाने बचावले आहेत. आज (शुक्रवारी) पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हे सर्व 21 मजूर एका खासगी कंपनीत कामाला होते. कंपनीच्या मालकाला न सांगताच मध्यप्रदेशातील त्यांच्या गावी ते पायी निघाले होते. लोहमार्गावरून ते भुसावळच्या दिशेने निघाले होते. चालून दमल्याने ते लोहमार्गावर बसले आणि रेल्वेगाड्या बंद असल्याचे समजून लोहमार्गावरच झोपी गेले. मात्र झोपेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

जालनाकडून औरंगाबादला जाणाऱ्या मालगाडीखाली सापडून 16 मजूर जागीच ठार झाले. एक मजूर गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार मजूर लोहमार्गाच्या बाजूला झोपले असल्यामुळे त्यांच्या सुदैवाने बचावले. दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे हे मजूर मिळेल त्या रस्त्याने घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील एका कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले गेले. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत, अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १६ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले, तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.

जिवंत प्रत्यक्षदर्शी मजूर:-
1) इंद्रलाल कमलसिंग धुर्वे (वय 20 वर्ष), रा. पोवडी, ता. घोगरी, जिल्हा मांडला
2) वेरेंद्रसिंग चेंनसिंग गौर (वय 27 वर्ष), रा. ममान, ता. पाली, जिल्हा उमरिया
3) शिवमानसिंग हिरालाल गौर (वय 27 वर्ष) रा. शाहारगड, ता. शाही, जिल्हा शाहडोल

जखमी व्यक्ती :-
1) सज्जनसिंग माखनसिंग धुर्वे, रा. पोंडी, ता. जुनावणी, जिल्हा मंडल खजेरी

औरंगाबाद रेल्वे अपघातातील मृतांची नावं

1)धनसिंग गोंड रा. अंतवळी जी. शाहडोल, राज्य – मध्य प्रदेश.
2) निरवेश सिंग गोंड, अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश
3) बुद्धराज सिंग गोंड, रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश
4) अच्छेलाल सिंग, चिल्हारी, मानपुर जी. उमरिया मध्य प्रदेश
5) रबेंन्द्र सिंग गोंड, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश
6) सुरेश सिंग कौल, जी. सडोळ, मध्य प्रदेश
7) राजबोहरम पारस सिंग, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश
8) धर्मेंद्रसिंग गोंड, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश
9) बिगेंद्र सिंग चैनसिंग, रा. ममाज, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश
10) प्रदीप सिंग गोंड, रा. जमडी, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश
11) संतोष नापित,

12) ब्रिजेश भेयादीन रा. बहिरा इटोला, शहरगड चाटी, सहडोल.

13) मुनीमसिंग शिवरतन सिंग, रा. नेवासा, पोस्ट, बकेली तहसली पाळी, जी. उमरिया.
14) श्रीदयाल सिंग रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश
15) नेमशाह सिंग चमदु सिंग, रा. नेवासा, पोस्ट बकेली, जी. उमरिया.
16) दिपक सिंग अशोक सिंग गौड रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश

 

 

 

 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“त्या” विमान प्रवाश्यांना भरपाई दिलीच पाहिजे: मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 टर्मीनलवर घोषणाबाजी करत...

मद्यतस्करी :18 लाखाचा मुद्देमाल जप्त,3 गजाआड

पुणे :दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ...

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार ‘दिव्यांग भूषण 2025’ पुरस्काराने सन्मानित

नागपूर, दि. 9 डिसेंबर 2025: महावितरणमधील दिव्यांग अधिकारी आणि...