विघ्नहर कारखान्याची ३७ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात

Date:

विषयपत्रिकेवरील सर्व १२ विषयांना सभासदांची एकमुखी मंजूरी
जुन्नर /आनंद कांबळे 
  श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज बुधवारी (दि.१८) खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषयपत्रिकेवरील सर्व १२ विषयांना सभासदांनी एकमुखी मंजूरी दिली.
अध्यक्षस्थानावरुन सभासदांना मार्गदर्शन करताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाची एफ.आर.पी. प्रतिटन रुपये २६८५ इतकी होती. या सिझनमध्ये गळीतास आलेल्या ऊसास संपूर्णपणे एफ.आर.पी पेमेंट कारखान्याने अदा केले असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले. आगामी २०१९-२० गाळप हंगामात आपण ८ लाख मे. टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असून हंगामाच्या तयारीसाठी कारखान्याने ऊस तोडणी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यामध्ये ६०० टायर बैलगाडी, २५० ट्रॅक्टर टायरगाडी, ३०० ट्रक / टोळी तसेच ५ ऊस तोडणी यंत्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर को-जनरेशन प्रकल्प व डिस्टीलरी विभागातील देखभाल, दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यामध्ये असून येत्या ऑक्टोबर २०१९ अखेरपर्यन्त कारखाना ऊस गाळपासाठी सज्ज होत असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस पिकावर हुमणी किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव        होत असल्याने विघ्नहरने सुमारे १३ टन भुंगेरे गोळा करुन त्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला. हुमणी आटोक्यात आणणेसाठी शेतकी विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.
  सत्यशिल शेरकर म्हणाले की, केंद्ग सरकारने बफर स्टॉक अनुदान व साखरेवरील निर्यात अनुदान जाहिर केले. परंतू अनुदानाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. निर्यात साखरेचे अनुदान लवकर देणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.सतत मागिल दोन वर्षे साखर उत्पादन जास्त झालेने बाजारभाव कमी होवून शेतकर्‍यांना  देणे अवघड  झाले. यावर केंद्ग शासनाने मागिल दोन वर्षे कारखान्यांना सॉफ्टलोनद्वारे पैसे उपलब्ध करुन दिल्यामुळे   पूर्ण करता आली. तथापि, याद्वारे मोठ्या प्रमाणावर कर्जाचा बोजा कारखान्यांवर निर्माण           झाला. सदर कर्जाची परतफेड एक वर्षे मुदतीची असल्याने याचा परिणाम कारखान्यांच्या खेळते भांडवलावर होत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. केंद्ग सरकारने साखरेचे किमान विक्री मुल्य ३१००/- रु. केले. याचा फायदा होणे अपेक्षित होते. परंतू देशामध्ये एकच दर ठेवल्याने उत्तर प्रदेश सारख्या राज्याला त्याचा चांगला फायदा झाला. संपूर्ण देशभर उत्तर प्रदेशची साखर जाऊ लागली. व महाराष्ट्रातील साखरेचे साठे आजही पडून आहेत. याचा परिणाम साखरेवरील व्याजाचा बोजा वाढला असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार क्रियाशिल सभासद राहणेसाठी ५ वर्षामधून एकदा गाळपास ऊस घालणे व ५ वर्षामधून एकदा वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहाणे अनिवार्य आहे, याबाबत सभासदांस वेळोवेळी नोटीशीद्वारे, अहवालाद्वारे कळविणेत आलेले आहे. सभासद क्रियाशिल नसल्यास त्यांना  मिळणार्‍या अनेक सवलती, सोई-सुविधा व हक्कापासून वंचीत रहावे लागणार आहे. सर्व सभासदांनी याबाबत जागरुक रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 सत्यशिल शेरकर म्हणाले की मागिल दोन वर्षांमध्ये सलग साखरेचे बंपर उत्पादन झालेने साखरेचे बाजारभाव देशांर्तगत व आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळले. आपल्या को-जन. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा करार मागीलवर्षी संपला. त्याचा विज खरेदी दर ६.४५ पैसे युनिट होता. तो आज ३.५६ पैस युनिट झाला आहे. त्यामुळे को-जन. युनिटमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले. संचालक मंडळाने नेहमीच ऊस उत्पादक, शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. व यापुढील काळामध्येही घेणार आहे. तथापि, सदरील सर्व बाबींचा विचार करता  पेक्षा अधिकचा भाव देणे अवघड आहे. परंतू यामधूनही आपण मार्ग काढून पैशांची उपलब्धता झालेवर आपली दिवाळी नक्कीच गोड करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी विघ्नहरचे संस्थापक स्व. निवृत्तीशेठ शेरकर व स्व. सोपानशेठ शेरकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन सभेच्या कामकाजास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे   ५ शेतकरी, हंगामात एकरी १११ मे.टन व त्यापुढील ऊस उत्पादन घेतलेले १४ शेतकरी, हंगामात एकरी १०० मे.टनाचे पुढे उत्पादन घेतलेले २७ शेतकरी, हंगामात जास्तीत जास्त ऊस तोडणी करणारे ४ कंत्राटदार, हंगामात जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे २ कंत्राटदार, हंगामात हार्वेस्टरने जास्तीत जास्त ऊस तोडणी करणारे १ कंत्राटदार यांचा ट्रॉफी, प्रशस्तीपत्र, पुरस्कार व रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर पारगांव तर्फे आळे येथील ऊस उत्पादक शेतकरी विकास चव्हाण यांना पुणे जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी अनेक सभासद शेतकर्‍यांनी चर्चेत भाग घेवून प्रश्न मांडले. तसेच सुचना केल्या. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी समाधानकारक खुलासा केला. कार्यकारी संचालक राजेंद्ग जंगले यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सेक्रेटरी अरुण थोरवे यांनी दुःखवट्याचा ठराव मांडला. उपस्थित सभासदांचे आभार व्हाईस चेअरमन अशोकशेठ घोलप यांनी मानले.
 कारखान्याच्या ३७ व्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी  कारखान्यास हंगाम २०१८-१९ साठीचा नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज, नवि दिल्ली या संस्थेकडून तांत्रिक कार्यक्षमतेचा उच्च साखर उतारा विभागातील संपूर्ण भारत देशातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सलग तिसर्‍यांदा मिळाला असून नुकताच भारतीय शुगर या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर उद्योगासाठी काम करणार्‍या अशा प्रथितयश संस्थेकडून कारखान्यास राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ ऊस विकासाचे पारितोषिक मिळाले आहे. सदरहू बक्षिस वितरण समारंभ येत्या २१ सप्टेंबर-२०१९ रोजी कोल्हापूर येथे होणार असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी यावेळी सांगितले. विघ्नहर कारखान्याला मिळालेल्या या दोन्ही पुरस्कारांबद्दल कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्यावतीने चेअरमन सत्यशिल शेरकर व सर्व संचालक मंडळाचा याप्रसंगी सत्कार  करण्यात आला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.