महाराष्ट्रातील आद्य लेणीं पैकी एक जुन्नर येथील तुळजा बुद्ध लेणी.

Date:

जुन्नर /आनंद कांबळे
सम्राट अशोकांनी बुद्धांच्या पवित्र अस्थिधातुंवर ८४००० स्तुप बांधले, लेणी कोरल्या,पहिली लेणी बिहार येथील बराबर येथे कोरली.जगप्रसिद्ध सांची, सारनाथ, भरहूत येथील स्तुप आपल्याला माहीत आहेत. सांची येथील बुद्ध स्तुपाचे चित्र आज नवीन आलेल्या २०० च्या नोटेवर आपणास पहायला मिळते.
जुन्नर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले शहर.ज्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्याच्या पश्चिम बाजुला कड़ेलोटाच्या पायथ्याजवळ एक टेकडी लागते.त्या टेकडीपासून जवळच ठाकरवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या शेवटी तुळजा लेणी कोरलेली आपणास पहायला मिळते.
भारतातील एकून लेण्यांपैंकी सर्वांत जास्त लेणी जुन्नर तालुक्यात आहेत. त्यापैंकीच तुळजा लेणी.तुळजा लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लेणी महाराष्ट्रात कोरण्यात आलेली सर्वात पहिली लेणी असावी,असे बौद्ध लेणी अभ्यासक व पत्रकार सिध्दार्थ कसबे यांनी सांगितले .
ही लेणी सम्राट अशोकांच्या काळातच कोरली गेली असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे.
या लेणीमध्ये असलेला स्तुप हा अन्य ठिकाणी पाहायला मिळत नाही. या स्तुपाच्या भोवती बारा अष्टकोणी खांब आहेत आणि वरती गोलाकार घुमट… बाजुलाच बौद्ध भिक्षुंसाठी विहार, भोजनालय, सभा मंडप कोरले आहेत. काही ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम केलेले पहायला मिळते. यात उपासक स्तुपाची पूजा करताना दाखवले आहेत. बुद्ध, धम्म, संघ या तीन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्धा जुन्नर येथील प्रत्येक लेणीमध्ये कोरलेले दिसते. डोंगरावरुन कोसळणारे धबधब्याचे पाणी थेट लेणीसमोरच पानकोदीमध्ये साठवले जाते. पावसाळ्यात लेणीचे सौंदर्य अधिकच खुलून येते. लेणीमधून समोर असणारा विस्तीर्ण जुन्नर तालुका, शिवनेरी किल्ला दिसतो.
लेण्यांमधील चित्र
या लेणीच्या अभ्यासासाठी अनेक अभ्यासक येत असतात. लेणी आणि शिल्प कलेचे अभ्यासक महेंद्र शेगावकर सर या लेणीबद्दल सांगतात की, या लेणीच्या निर्मितीचा काळ हा सुरुवातीचा म्हणजे इ.स.पू २३० चा आहे. नंतर तिथे अजिंठ्यासारखे चित्रकलेच्या माध्यमातून जातक कथा व बुध्द चरित्रातील प्रसंग साकारण्यात आली.
या लेणीची प्रसिद्धी हेन्री कुझेनच्या कानावर गेली. मुंबई गव्हर्नर व तो या लेणी पाहण्यासाठी येणार होते असा निरोप जून्नरच्या कलेक्टर ला मिळाला. गव्हर्नर येतात म्हणून लेणीची साफसफाई करुन घेण्यात आली. वाढलेली झुडपे, कोळी किष्टके, पाकोळ्याची घाण काढण्यात आली. ही घटना १९१८ मधील आहे. पाणी टाकून गोणपाट – कांबळीच्या मदतीने लेणीच्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या. त्यामुळे सर्व चित्रे नष्ट झाली. जेव्हा गव्हर्नर, हेन्री कुझेन आले… बघतात तर काय? तो हा प्रकार… जे पाहण्यासाठी आले तेच नष्ट झालेले होते. अतिउत्साह व अज्ञानापायी ऐतिहासिक ठेवा नष्ट झाला होता.
झालेल्या प्रकारामुळे त्यांनी कपाळावर हात मारुन घेतला. याबाबतचा तेव्हाचा अहवाल आजही पुरातत्व खात्याकडे आहे. अज्ञानापायी असे प्रकार अनेक ठिकाणी झालेले आहेत. सोळाव्या – सतराव्या शतकात सारनाथ येथील तथागतांच्या अस्थीचा सोन्याचा करंडक सापडला. त्यातील रक्षा गंगेत श्रद्धापूर्वक विसर्जित करण्यात आली व तो करंडक जपून ठेवण्यात आला. तुळजा लेणी स्तुप व त्यावर असलेले गोल छत्र व बारा गोलाकार स्तंभ अशी रचना अन्यत्र कुठेही आढळून येत नाही.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...