शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय शेतीचा पर्याय आदर्शवत- डॉ. सदानंद मोरे

Date:

पुणे : ”शेती व्यवसायाला मंदी नाही आणि कोणी बंदीही घालू शकत नाही. असे असले तरी मागील अनेक वर्षांपासून शेतीची आणि शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. आजपर्यंत अनेक शेतकरी चळवळी होऊन गेल्या तरी परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. अशावेळी शेतीमधील नवीन प्रयोगांचा विचार करणे आवश्यक आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन शेती व्यवसायाचे नियोजन व्हावे. त्यासाठी सेंद्रिय शेतीचा पर्याय शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे. जलकेंद्रित आणि सेंद्रिय शेतीच्या जोरावर शाश्वत शेतीचे उद्दिष्ट गाठता येईल,” असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित आणि डॉ. चित्रलेखा पुरंदरे लिखित ‘सेंद्रिय शेतीची यशोगाथा’ (एका एकराची अभिनव ‘ज्ञानेश्वरी’) या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी माजी विभागीय आयुक्त सुधीरकुमार गोयल, नाबार्डचे माजी मुख्य प्रबंधक एम. व्ही. अशोक, जलतज्ज्ञ डॉ. दि. मा. मोरे, अभिनव फार्मर्सचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके, लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणे, सहसंपादक संदीप तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकातून ज्ञानेश्वर बोडके यांनी केलेल्या अभिनव उपक्रमाची यशोगाथा शब्दबद्ध करण्यात आली आहे.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ”माणसाने स्वतःबरोबरच इतरांचाही विचार करावा. आपल्याकडून झालेले यशस्वी प्रयोग इतरांना सांगावेत. याच विचारातून ज्ञानेश्वर बोडके यांनी इतर शेतकऱ्यांना आधार दिला आहे. त्यांनी शेतीमध्ये केलेल्या प्रयोगांना मिळालेले यश इतरांसाठी मार्गदर्शक आहे. शेती हा उद्योग आयटी क्षेत्राइतकाच मोठा आहे. शासनाने याबाबतची चांगली धोरणे बनवून शेतकऱ्यांना बळकटी द्यावी.”
सुधीरकुमार गोयल म्हणाले, ”शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडले जाणे खूप गरजेचे आहे. व्यवसाय वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी पर्यायांचा विचार करावा. घरपोच शेतीमाल पुरविण्यासह आठवडीबाजार, मॉल याकडे जावे. ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतीमध्ये क्रांती घडवली आहे. त्यांच्या कार्यावरील हे पुस्तक अनेकांसाठी मार्गदर्शक ठरेल. शासनाच्या लोकांनीही बांधावर जाऊन शेतकऱ्यांची, शेतीची माहिती घेतली पाहिजे.”
डॉ. दि. मा. मोरे म्हणाले, ”शेतमालाचे उत्पादन करणे, त्यावर प्रक्रिया करणे व विक्री अशा प्रकारे शेतकऱ्याने काम केले पाहिजे. आज शेती पिकविणारा शेतकरी नाही तर दलाल श्रीमंत झाला आहे. दलालाला दूर करून शेतमालाची थेट विक्री केली पाहिजे. शेतकाऱ्यांनी शेतीचे विज्ञान समजून घेतले पाहिजे शेती सोबत शेत मालाच्या उद्योगावर भर दिला जावा.”
ज्ञानेश्वर बोडके म्हणाले, ”कमी पाणी, कमी मनुष्यबळ आणि चांगल्या सुविधांचा अभाव असला, तरी एका एकरातही चांगली शेती पिकविता येते. सेंद्रिय पद्धतीने पूर्णपणे विषमुक्त अन्न तयार करून यशस्वी शेती व्यवसाय केली जाऊ शकते. शेतीमध्ये केलेले हे प्रयोग पुस्तकात मांडले आहेत. हे पुस्तक देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे. यामधून शेतऱ्यांना नवीन मार्ग आणि प्रेरणा मिळेल.”
डॉ. परशुरामन व एम. व्ही. अशोक यांनीही मनोगत व्यक्त केले. शेतीतील अभिनव प्रयोगांची यशोगाथा असलेले हे पुस्तक अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी ई-बुक स्वरूपात व अन्य भाषांमध्ये आणणार असल्याचे विशाल सोनी यांनी प्रास्ताविकात सांगितले. डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका मंडळी. संदीप तापकीर यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर सोनावणे यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...