महात्मा गांधी हे निसर्गोपचाराचे जनक डॉ. विकास आबनावे

Date:

पुणे: “राष्ट्रपिता महात्मा गांधी हे निसर्गोपचाराचे जनक होते. ते कधीही मौनात नव्हते तर  ते स्वतःशी संवाद साधायचे, चंपारण्यातील शेतकऱ्यांना सरकार सक्तीने नीळ लागवड करण्यास लावत. त्या विरोधात गांधीजींनी आवाज उठवला. त्यामुळे  शेतकऱ्यांना शेतसाऱ्यातुन व सक्तीने नीळ पिकवण्याच्या अन्यायातून मुक्ती मिळाली. रूग्णसेवा करताना अंतःकरणात नेहमी दया, शांती, प्रेम, करूणा असायला हवी. मन स्वच्छ केल्याखेरीज शांती लाभू शकत नाही. सत्य नाकारता येत नाही हे जगातील अंतिम सत्य आहे, असे महात्मा गांधींचे विचार होते.” असे प्रतिपादन महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी केले.

 

महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या सुमती शहा आयुर्वेद महाविद्यालय, हडपसर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयवंत मटकर आणि प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विकास आबनावे उपस्थित होते. संस्थेचे हे हिरक महोत्सवी वर्ष आहे .

 

यावेळी आयुर्वेदिक महाविदयालयाचे वैदयकिय शाखेचे विदयार्थी, प्राध्यापक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते . डॉ. आबनावे यांनी ‘गांधी: काल आणि आज’ या विषयावर व्याख्यान देत विदयार्थी आणि प्राध्यापकांना मार्गदर्शन केले .

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंत मटकर म्हणाले की “गांधी सर्वानी समजून घ्यायला पाहिजे. गांधी आचरणात आणायचा असेल तर प्रत्येकाने खादीचा वापर केला पाहिजे.” प्रत्येकाने एक तरी खादीचा ड्रेस वापरावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर मुंबई | दि. २५...

भाजपचे नेते गुंडाना पोसण्याचे काम करत आहेत-मिलिंद एकबोटे

तर भाजपाचीही काँग्रेससारखी दयनीय अवस्था होईल हिंदुत्वाची उपेक्षा कराल, तर हिंदुत्ववादी...