दुर्गम भागात स्वच्छतागृह उभारण्याचे कार्य कौतुकास्पद -डॉ. कैलास शिंदे

Date:

फिनोलेक्स-मुकुल माधव फाउंडेशनकडून आदिवासी भागात ३३२ शौचालयाची निर्मिती
पुणे : “महाबळेश्वरसारखे गाव स्वच्छतेमध्ये पहिल्या क्रमांकावर येते आणि राज्यातील इतर काही गावात स्वच्छतागृहच नाहीत, हा मोठा विरोधाभास आहे. सरकारच्या अनेक योजना आहेत, परंतु त्या तळागातील नागरिकांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे अशी गावे या योजनांपासून वंचित राहतात. गावात स्वच्छतागृह नसल्यामुळे महिला, मुली, बालके, वयोवृद्ध व्यक्तींना अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. अशावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून ३३२ शौचालये उभारली गेली आहेत. या दुर्गम भागात त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे,” अशा शब्दात पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला.
ग्रामीण भागातील आरोग्य चांगले राहावे आणि परिसरातील वातावरण स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या युवा परिवर्तन संस्थेच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात एकूण ३३२ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. त्यातील पाचव्या टप्प्यात वाडा तालुक्यातील सांगेनाणे गावात १२५ शौचालयांचे व सौर दिव्यांचे उद्घाटन नुकतेच स्वच्छतेसाठी बकेट, मग आणि सफाईचे साहित्यही देण्यात आले. यावेळी तहसीलदार उद्धव कदम, फिनोलेक्सचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, बबलू मोकळे, मंगेश तळेकर, प्रांत अधिकारी अर्चना कदम, सरपंच कांचन संभारे, तलाठी श्रीकांत कुंभार, पोलीस पाटील सुरेश पाटील, युवा परिवर्तनच्या निकोला मोंटेरिओ, भगवान कांबळे, विस्तार अधिकारी संदीप जाधव, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी बांधवांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेविषयी जागृती आणि शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात फाउंडेशनने घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. गावातील शौचालयांची देखभाल आणि त्याचा होत असलेला वापर समाधानकारक असल्याचे सांगून, गावकऱ्यांनी उघड्यावर शौचास न जाता या शौचालयांचा वापर करण्याचे आवाहनही डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
या उपक्रमाविषयी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “फिनोलेक्स आणि ‘मुकुल माधव’ने ३०० शौचालयांचा टप्पा ओलांडला आहे. आदिवासी भागातील जास्तीत लोकांना या प्रकल्पाचा लाभ देण्यासाठी समविचारी लोकांना सोबत घेऊन प्रयत्न करीत आहोत. झेडएफ गिअर्स, हिंदुजा लिलॅन्ड फायनान्स आदी संस्थांचे सहकार्य लाभत आहे. उघड्यावर शौचाला बसणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शौचालये आणि सौर दिव्यांसह या भागात पाणी संवर्धनासाठी उपक्रम सुरु आहेत.”
बी. आर. मेहता म्हणाले, “अस्वच्छेतेमुळे अनेक आजार उद्भवतात. परिणामी, ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनने ग्रामीण भागात शौचालय उभारून स्वच्छतेबाबत जागृती सुरु केली आहे. पाच टप्प्यात ३३२ शौचालये उभारली असून, पुढील सहाव्या टप्प्यात आणखी १२७ शौचालये उभारली जाणार आलेत. त्यामुळे पालघरमध्ये फाउंडेशनच्या वतीने एकूण ४५९ शौचालये उभारली जातील.”
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...