बंधुतेच्या अभावामुळेच देशात अस्थिरतेचे वातावरण- डॉ. श्रीपाल सबनीस

Date:

पुणे : “सर्व संतांनी, महापुरुषांनी बंधुतेचे मूल्य आपल्या साहित्यातून व कृतीतून मांडले आहे. धर्मग्रंथानीही बंधुतेला प्राधान्य दिल्याचे दिसते. मात्र, राजकीय आकांक्षेपोटी आणि स्वार्थी भावनेने अनुयायांनी महापुरुषांना जातीधर्माच्या बंदिस्त करून बंधुतेचा गळा घोटण्याचे काम केले आहे. स्वातंत्र्य, समतेवर आपण बोलतो. मात्र, त्याचा मूळ गाभा असलेल्या बंधुतेला आपण बाजूला केले आहे. आज समाजात बंधुतेचा अभाव आहे आणि बंधुतेच्या या अभावामुळेच देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितून बाहेर पडून देशाला एकसंध ठेवायचे असेल, तर आपण प्रत्येकाने बंधुभाव जोपासण्याची गरज आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व एकविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्या संयुक्तपणे भोसरी येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात आयोजिलेल्या एकविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आणि प्रकाश पगारिया व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, नवी दिल्ली येथील ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष पारस मोदी, संघटक डॉ. विजय ताम्हाणे, संयोजक प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, सहसंयोजक महेंद्र भारती, प्राचार्य रामचंद्र जगताप, कवी चंद्रकांत वानखेडे, संगीता झिंजुरके, पत्रकार शिवाजीराव शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा काढण्यात आली. यामध्ये साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘बंधुतेच्या विचारधारा’ या अध्यक्षयीय भाषण पुस्तकाचे, ‘मूल्यवैभव’ संमेलन स्मरणिकेचे. ‘पवनेचा प्रवाह’ संमेलन विशेषांकाचे, तर डॉ. अशोक शिंदे लिखित ‘अक्षरसाधना’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर कवी चंद्रकांत वानखेडे यांचा ‘जाऊ कवितेच्या गावा’ हा कर्यक्रम सादर झाला. प्रसंगी भोसरी येथील टागोर शिक्षण संस्थेच्या टागोर माध्यमिक विद्यालयाला ‘श्यामची आई पुरस्कार’ देण्यात आला. रमेश पाचंगे यांच्या चौघडा वादनाने उपस्थितांची मने जिंकली.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “भारताच्या लोकशाहीचा ग्रंथ संविधान असून, त्याचा गाभा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या सुत्रावर आधारीत आहे. मात्र, या मूल्यात्मक सूत्रांना आपण समान पातळीवर स्वीकारलेले नाही. बंधुतेचे मूल्य बाजूला पडले आहे. राजकारणी, साहित्यिक किंवा सामाजिक कार्यकर्ते कोणीही बंधुतेला प्राधान्य देत नाही. खरेतर बंधुता हे या सगळ्यांच्या मुळाशी असून, समाजातील व देशातील सर्व प्रश्नांवरचे उत्तर आहे. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणूसपणाची संवादी भूमिका असलेल्या बंधुतेच्या सिद्धांताला कृतिशीलतेची जोड देण्याची आवश्यकता आहे. बंधुतेचे मूल्य राष्ट्रीय पातळीवर रुजविण्याची गरज असून, आपण प्रत्येकाने बंधुतेच्या मूल्याचा स्वीकार केला पाहिजे.”
डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “बंधुतेचा विचार निसर्गामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. सारा निसर्ग बंधुतेच्या तत्वावर उभा आहे. मात्र, माणुसकीचा माणसाला विसर पडल्याने बंधुतेचा अस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळते. समानतेच्या, बंधुतेच्या विचारांमध्ये असलेला विरोध दूर करण्याची जबाबदारी धर्मगुरुंवर आहे. सर्व धर्मग्रंथात मर्यादा असल्या, तरी त्यात कालानुरूप बदल केला पाहिजे. कारण समाजातील कटुता घालावयाची असेल, तर माणसामाणसांमध्ये बंधुतेची भावना भिनायाला हवी. बंधुत्व म्हणजे किती व्यापक आणि उदात्त कल्पना आहे, हे आपण समजून घ्यायला हवे. साहित्य आणि समाजाचा एकमेकांवर प्रभाव असतो. साहित्यातून समाजजीवनाचे, वर्तमान स्थितीचे प्रतिबिंब पडत असते. त्यामुळे समाजाचा आरसा बनून साहित्याने बंधुता रुजविण्याचे काम करावे.”
पारस मोदी म्हणाले, “समाजामध्ये चांगले विचार रूजण्यासाठी बंधुतेचे हे साहित्य संमेलन गरजेचे आहे. अशा संमेलनातुन अनेक नवीन विचार समाजाला मिळतात. बंधुता जाती-धर्म-पंथ विसरून सर्वाना एकत्र आणते, हे सुखावह आहे.” स्वागतपर भाषणात कृष्णकुमार गोयल म्हणाले, “संत-महात्म्यांनी, आपापल्या कालखंडात मांडलेले बंधुतेचे तत्वज्ञान भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे नेले आणि ते जगाने स्वीकारलेही. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आपणही कृतिशील होण्याची गरज आहे. त्यासाठी बंधुतेची अभाव आणि प्रभावरूपे समजून घ्यायला हवीत.”
बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले. डॉ. अशोक शिंदे यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...