अण्णाभाऊंची जन्मशताब्दी समाजपरिवर्तन वर्ष म्हणून साजरे करणार

Date:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘आरपीआय’च्या वतीने अभिवादन महासभा
पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज परिवर्तनासाठी आपले आयुष्य झिजवले. मातंग समाजासह इतर वंचित समाजाच्या व्यथा त्यांनी आपल्या साहित्यातून, वाणीतून मांडल्या. आजही मातंग, दलित समाज मागासलेला आहे. समाजाचे परिवर्तन करण्यासाठी अण्णाभाऊ यांची जन्मशताब्दी सामाजिक परिवर्तन वर्ष म्हणून साजरी करणार आहे,” असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी प्रारंभी त्यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सारसबाग परिसरात पक्षाच्या वतीने झालेल्या अभिवादन महासभेत हनुमंत साठे बोलत होते. याप्रसंगी शहराध्यक्ष अशोक कांबळे, नगरसेविका सोनाली लांडगे, महाराष्ट्राचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, शैलेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
हनुमंत साठे म्हणाले, “देशातील विविध समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना अजूनही मातंग समाज पाठीमागे राहिलेला आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे विविध प्रश्न सोडविले पाहिजेत. तसेच समाजातील व्यक्तींनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचून त्यांचे विचार अमंलात आणले, तर समाज प्रगती करेल. समाजाच्या विकासासाठी महामंडळाला भरघोस निधी सरकारने द्यावा. कर्जवाटप लवकरात लवकर सुरु करावे. तसेच समाज घडविण्याचे काम करणाऱ्या अण्णाभाऊंना भारत सरकारने भारतरत्न सन्मान द्यावा.”
परशुराम वाडेकर म्हणाले, “साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या उत्साहात साजरी करतो. परंतु त्यांचे विचार अंमलात आणत नाही. जोपर्यंत त्यांचे विचार कार्यकर्त्यांना समजणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही. त्यामुळे अण्णाभाऊ समजून घ्यायला हवेत. अण्णाभाऊच्या प्रत्येक कादंबरीत महिला नायिका होती. कारण पुरुषाबरोबर महिलेलादेखील समान हक्क मिळाला पाहिजे, ही त्यांची भावना होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी आपल्या लेखनीतून आणि भाषणातून आवाज उठवला होता.”
अशोक कांबळे म्हणाले, “रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजिले जाणार आहेत. त्यामध्ये अण्णाभाऊंचे साहित्य आणि त्यांचा जीवनप्रवास तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.” बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, अशोक शिरोळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. महिपाल वाघमारे व बाबुराव घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा कांबळे यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...