स्पर्धा परीक्षेतील यश म्हणजेच सर्वस्व नाही-भूषण गगराणी

Date:

पुणे : “स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण मेहनत घेतात. मात्र, इथे स्पर्धा मोठी आणि जागा कमी अशी स्थिती असल्याने अनेकांना अपयश येते. तीन-चार किंवा त्यापेक्षा अधिक वेळा परीक्षा देऊन यश मिळाले नाही, तर वैफल्य येते. मात्र स्पर्धा परीक्षेतील यश-अपयश हेच सर्वस्व नाही. त्यासाठी केलेल्या अभ्यासाचा उपयोग आपल्याकडील ‘बी प्लॅन’ यशस्वी करण्यासाठी करायला हवा,” असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी केले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वास्तव ,भवितव्य व दिशा दाखवण्यासाठी आयोजित स्पर्धा परीक्षा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भूषण गगराणी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, स्टडी सर्कलचे संचालक डॉ. आनंद पाटील, सृजन फाऊंडेशनचे संस्थापक व बारामती अॅग्रो फूड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार, एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे, किरण निंभोरे आदी उपस्थित होते.भूषण गगराणी म्हणाले, “तीस वर्षांपूर्वी अभ्यासासाठी काहीच माहिती किंवा मार्गदर्शन उपलब्ध नव्हते. आज माहितीचा खजिना आणि मार्गदर्शन करणारे क्लासेस मोठ्या प्रमाणावर आहेत. स्पर्धा परीक्षांविषयी जागृती झाल्याने त्याकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनेकजण स्वप्न घेऊन पुण्या-मुंबईत तयारी कारण्यासाठी येतात. खूप अभ्यासही करतात. मात्र, यशासाठी केवळ अभ्यास उपयुक्त नसतो. तर नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि सजगपणे केलेली तयारी तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. स्पर्धा परीक्षेतील अभ्यासक्रमात सातत्याने बदल होत असतात. ते समजून घेऊन आपण तयारी केली पाहिजे. पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे. मात्र अवास्तव अपेक्षा असू नयेत. प्रशासनात येताना आपले उद्देश चांगले असावेत. स्पर्धा परीक्षेतील यश हे साध्य नसून, ते करिअरचे एक साधन आहे. मान-सन्मान आणि आदर हे आपल्या कामातून मिळत असते. त्यामुळे कामातील सचोटी, प्रामाणिकपणा महत्वाचा असतो.

मधुकर कोकाटे म्हणाले, “परीक्षा पद्धती नीट समजून घेणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता आपल्यातील क्षमता ओळखून त्याप्रमाणे तयारी केली पाहिजे. तीन-चार वर्षांच्या तयारीनंतर उत्साह कमी होतो. म्हणून विद्यार्थ्यांनी तीन-चार वेळा परीक्षेत यश आले नाही, तर त्यामागे धावण्यापेक्षा अन्य पर्यायांवर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. या परीक्षांमधील जागा अथवा पदे ही मर्यादित असणार आहेत. त्यामुळे अपयश आलेल्यांनी खचून जाऊ नये. या परीक्षांसाठी केलेल्या तयारीचा उपयोग अन्य करिअरसाठी करावा. या क्षेत्रातील मार्गदर्शकांनी अभ्यासक्रम शिकविण्यासोबतच प्रोत्साहकाची (मेंटॉर) भूमिका बजावायला हवी. एक चांगला नागरिक घडविण्याची जबाबदारी आपली आहे.”
आनंद पाटील म्हणाले, “स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची मॅरेथॉन आहे. या परीक्षा देण्यासाठी ‘शहाणपण’ असणे अधिक महत्वाचे आहे. आपल्यातील क्षमता ओळखून या परीक्षांमधील कोणता पर्याय निवडायचा ते ठरवावे. स्पर्धा परीक्षेच्या प्रेमात पडल्याशिवाय किंवा त्याचे व्यसन लागल्याशिवाय तुम्हाला त्यात यश मिळणार नाही. वेळेचे नियोजन, चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. या परीक्षा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा मार्ग आहे. या परीक्षांची तयारी करताना अभ्यासासोबतच आहार आणि आरोग्य या गोष्टींनाही महत्व द्यायला हवे.”

रोहित पवार म्हणाले, “विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करतानाच करिअरसाठी योग्य दिशा मिळावी, यासाठी हा महोत्सव आयोजिला आहे. आपले स्वप्न हे कुटुंब आणि मित्रपरिवाराचेही असते. त्यामुळे वेळीच आपण सजग होऊन, वास्तव समजून घेत वाटचाल केली पाहिजे. ज्या क्षेत्राची आपण निवड केली, त्यात प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असते. अपयशाने खचून न जात अन्य संधींचा वेध घेत त्यामध्ये ध्येय निश्चित करून वाटचाल केली पाहिजे.

महेश बडे यांनी प्रास्ताविक केले. निलेश आरडळे, त्रिवेणी काहलकर, आरिप पटेल यांनी सूत्रसंचालन केले. किरण निंभोरे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...