Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण

Date:

मुंबई-श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचे नाव आले तरी राजकीय कुतुहूल कायम आहे.

कोरोनाचे संकट असताना अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होत असल्याने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले होते. राम मंदिर बांधून कोरोना जाईल असे भाजपवाल्यांना वाटत असेल तर हरकत नाही, अशा शब्दांत पवारांनी टीका केली होती. भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून भाजप व महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी राष्ट्रवादीसोबतच भाजपनेही घेतली असल्याचे सांगितले जाते.

भूमिपूजनाचे निमंत्रण पाठवण्यामागे आहेत ही कारणे

– सन १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली होती त्या वेळी “ते जर शिवसैनिक असतील तर त्याचा मला गर्व आहे’ अशा शब्दांत त्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. बाबरी पतन खटल्यातही शिवसेनाप्रमुखांचे नाव होते.
– जुलै २०१९ मध्ये उद्धव ठाकरे परिवारासह अयोध्येत शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन गेले हाेते. राज्यात सत्ता स्थापनेस १०० दिवस झाल्यावर ते दुसऱ्यांदा अयोध्येला गेले होते. तसेच शिवसेनेच्या वतीने मंदिर न्यासाला ५ कोटी देणगी देण्यात आली आहे.
– भाजपबरोबरील युती तुटल्यानंतर शिवसेना राम मंदिर मुद्द्यावर मोदी व भाजपला टोकत होती.

– महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सत्तेत असल्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची राजकीय कोंडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. अयोध्येतील उपस्थितीवरून आघाडीत वितुष्ट येऊ शकते असा त्यामागे होरा आहे.

– पवारांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे गप्प का ? शरद पवार यांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. त्यांच्या वक्तव्यावर स्वत:ला हिंदू म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का आहेत, असा प्रश्न ‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.

भूमिपूजन सोहळ्यासाठी पवारांची ‘एनओसी’ लागणार नाही ही अपेक्षा– प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, भाजप
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांचे ना-हरकत प्रमाणपत्र लागणार नाही अशी अपेक्षा आहे.

हिंदुत्व अजिबात सोडलेले नाही, हे सांगण्यासाठी शिवसेनेची धडपड
काँग्रेस-राष्ट्रवादी या धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर राज्यात सरकार स्थापन केले असले तरी हिंदुत्व अजिबात सोडलेले नाही, हे सांगण्याची धडपड शिवसेना करत आहे. मात्र मंदिराचा मुद्दा हातून गेल्याने शिवसेनेची गोची झाल्याचे मानले जाते.

राम मंदिर-शिवसेनेचे नाते राजकीय नव्हे अतूट, कायमसंजय राऊत,प्रवक्ते, शिवसेना


राम मंदिर आणि शिवसेनेचे नाते अतूट आणि कायम आहे. हे काही राजकीय नाते नाही. राजकारणासाठी आम्ही कधी अयोध्येला जात नाही. श्रद्धा आणि हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी राम मंदिरासाठी बलिदान केलेले आहे. अयोध्येच्या रस्त्यातील सर्व अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत.

अयोध्येला जाणे हा उद्धव ठाकरेंच्या श्रद्धेचा विषय– बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्यास तो त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...