सलग सहाव्या वर्षी इंदौर ठरले भारतातील सर्वात स्वच्छ शहर, भारतातील पहिले सप्ततारांकित कचरामुक्त शहर ठरण्याचाही मिळवला मान

Date:

स्वच्छ भारत अभियानाची आठ वर्षे आणि SBM-U 2.0 अर्थात, शहरी स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा या दोन्ही गोष्टींचे यश आज भारताने दिमाखदार पद्धतीने साजरे केले. नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने आज आयोजित केलेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या सर्वाधिक स्वच्छ राज्ये व सर्वाधिक स्वच्छ शहरे यांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव केला. महानगरे/ शहरे आणि राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी स्वच्छतेसाठी स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा करण्यासाठी आणि शहरांना कचरामुक्त असण्याची सप्ततारांकित प्रमाणपत्रे देण्यासाठी आयोजित या सोहळ्यात आज विविध श्रेणींमध्ये एकूण 160 पेक्षा अधिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपतींनी स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या डॅशबोर्डचे औपचारिक प्रकाशन केले आणि सर्वोत्कृष्ट 12 विजेत्यांना स्वहस्ते पुरस्कार प्रदान केले. सरोवरे आणि राजवाड्यांचे शहर अशी इंदौरची ओळख आहे. याच इंदौरने शाश्वतता आणि सुप्रशासन या बाबतींंत प्रभावशाली कामगिरी करत, सलग सहाव्या वर्षी लक्षाधिक लोकसंख्येच्या शहरांच्या श्रेणीत ‘भारतातील सर्वात स्वच्छ शहर’ होण्याचा मान पटकावला. सुरत सलग दुसऱ्यांदा द्वितीय क्रमांकावर असून नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांच्या श्रेणीत , महाराष्ट्रातील पांचगणी आणि कराड शहरांनी अनुक्रमे पहिला आणि तिसरा क्रमांक जिंकला तर छत्तीसगडमधील पाटनचा दुसरा क्रमांक आला. ‘सफाई मित्र सुरक्षा’ या श्रेणीत तिरुपती शहर सर्वोत्कृष्ट ठरले. गंगेकाठच्या शहरांपैकी लक्षाधिक लोकसंख्येच्या श्रेणीत उत्तराखंडमधील हरिद्वार सर्वोत्कृष्ट शहर ठरले.

कर्नाटकातील शिवमोग्गा शहराने सर्वाधिक झपाट्याने वरचा क्रमांक पटकावण्याचा पुरस्कार मिळवला आहे.

भारतातील पहिले सप्ततारांकित कचरामुक्त शहर ठरण्याचा मानही इंदौरने मिळवला असल्याने त्या शहराच्या स्वच्छतेवर मान्यतेची आणखी एक मोहोर उमटली आहे. तर सुरत, भोपाळ, मैसुरू, नवी मुंबई, विशाखापट्टणम, तिरुपती या शहरांनी कचरामुक्त शहर श्रेणीत पंचतारांकित प्रमाणपत्र जिंकले आहे.

राज्यांच्या पुरस्कारांमध्ये शंभराहून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असणाऱ्या राज्यांच्या श्रेणीत मध्यप्रदेश सर्वाधिक स्वच्छ राज्य ठरले. या श्रेणीत यापूर्वीची तीन वर्षे जिंकणाऱ्या छत्तीसगडला मागे टाकत मध्यप्रदेश राज्य विजयी झाले आहे. महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे. तर शंभराहून कमी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असणाऱ्या राज्यांच्या श्रेणीत त्रिपुराने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.